भारत आणि चीन यांच्यात सीमा वाद कायम राहिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा वाद मिटू शकला नाही. त्यामुळे दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर आल्याच्या घटना मागील काही वर्षांत घडल्या होत्या. त्यावेळी दोन्ही सैन्यात चकमकही झाली होती. परंतु आता भारत अन् चीन सीमा वाद सुटण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. पूर्व लडाखमधील सैन्य चीनने मागे घेतले आहे. लडाखमधील गलवानसह चार ठिकाणांचे सैन्य मागे घेतल्याची कबुली चीनने दिली आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात गुरुवारी झालेल्या चर्चेनंतर चीनने सैन्य मागे घेतल्याची माहिती चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनाद्वारे दिली आहे.
चीन परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त माओ निंग यांनी शुक्रवार सांगितले की, दोन्ही सैन्याने चार ठिकाणांवरुन माघार घेतली आहे. सीमेवर परिस्थिती स्थिर आहे. दोन्ही देशांच्या सैन्याने चीन-भारत सीमेच्या पश्चिमेकडील सेक्टरमधील चार पॉइंट्सवरून मागे जाण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे, ज्यामध्ये गलवान व्हॅलीचा समावेश आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी जिनिव्हा येथे शुक्रवारी दिलेल्या वक्तव्यानंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाची ही टिप्पणी आली आहे.
जयशंकर म्हणाले होते की, चीनसोबतच्या सैन्य माघारी संबंधित समस्यांपैकी 75 टक्के समस्या सोडवण्यात आल्या आहेत. मात्र सीमेवरील वाढते लष्करीकरण हा मोठा मुद्दा आहे.
तपशील देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, चीन-भारत संबंधांमध्ये स्थिरता दोन्ही देशांच्या लोकांच्या दीर्घकालीन हिताचे आहे. त्यामुळे दोन्ही देशांत प्रादेशिक शांतता राहणार आहे. चीन आणि भारत सरकार परस्पर सांमजस्य राखणे, विश्वास वाढवणे, सतत संवाद राखणे आणि द्विपक्षीय संबंधांना चालना देणे यावर भर देणार आहे. भारत आणि चीनने गुरुवारी पूर्व लडाखमधील सैन्य संपूर्ण माघारी घेण्याचे ठरवले होते, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
हाणामारीच्या दोन घटनांमध्ये परस्परविरोधी गुन्हे |
वयोश्री योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी वरदान : डॉ. अतुल भोसले |
प्राधिकरणाच्या कंत्राटी कर्मचार्यांचे धरणे आंदोलन |
डीजेच्या दणदणाटात बाप्पाला 17 तासानंतर निरोप |
कराडमध्ये शनिवारपासून मराठी चित्रपट संगीत महोत्सव |
ऑनलाईन बांधकाम व बिनशेती प्रणालीचा खेळखंडोबा थांबता थांबेना |
कै. सौ. कलावती माने यांची पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी भावपूर्ण वातावरणात संपन्न |
कराडात पोलीस-गणेश मंडळाचे कार्यकर्ते आमने सामने |
आमदार शिवेंद्रसिंहराजे वगळता सर्व विद्यमान आमदारांचे भवितव्य धोक्यात : हेमंत पाटील |
मस्त्य व्यवसायासाठी ठेक्याने द्यावयाच्या १०९ पाझर तलावांसाठी जाहीर लिलाव |
औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाई येथे संविधान मंदिराचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न |
परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालयात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह साजरा |
नगरपालिकेकडून गणेश विसर्जनासाठी 110 टनी क्रेन |
सौ.सायली जवळकोटे यांचे निधन |
कराडमध्ये शनिवारपासून मराठी चित्रपट संगीत महोत्सव |
ऑनलाईन बांधकाम व बिनशेती प्रणालीचा खेळखंडोबा थांबता थांबेना |
कै. सौ. कलावती माने यांची पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी भावपूर्ण वातावरणात संपन्न |
कराडात पोलीस-गणेश मंडळाचे कार्यकर्ते आमने सामने |
आमदार शिवेंद्रसिंहराजे वगळता सर्व विद्यमान आमदारांचे भवितव्य धोक्यात : हेमंत पाटील |
मस्त्य व्यवसायासाठी ठेक्याने द्यावयाच्या १०९ पाझर तलावांसाठी जाहीर लिलाव |
औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाई येथे संविधान मंदिराचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न |
परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालयात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह साजरा |
नगरपालिकेकडून गणेश विसर्जनासाठी 110 टनी क्रेन |
सौ.सायली जवळकोटे यांचे निधन |
पुढच्या वर्षी लवकर या..च्या जयघोषात विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
आर्थिक फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा |
हामदाबाज येथे 25 हजारांची घरफोडी |
महिलेचा विनयभंग, मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |