नवी दिल्ली : २६/११ मुंबई दहशतवादी हल्ला भारतीय विसरले नाहीत. मुंबईतील भ्याड असा २६/११ दहशतवादी हल्ला डोळ्यासमोर आल्यास आजही अंगावर काटा येतो. या हल्ल्यात अनेक पोलिस अधिकाऱ्यांसह, सामान्य नागरिकांना आपला जीव गमवाव लागला होता. त्यानुसार, या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेला पाकिस्तानी वंशाचा कॅनडाचा व्यापारी तहव्वूर राणा याला लवकरच भारताच्या ताब्यात दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२४ मध्ये अमेरिकी कोर्टाने निर्णय दिला होता की, दोन्ही देशांमधील प्रत्यार्पण करारानुसार राणाला भारताकडे प्रत्यार्पण केले जाऊ शकते. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये बॅक चॅनेलची चर्चा सुरू आहे. त्यानंतर कोर्टाने राणाच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील सहभागाबद्दल भारताकडे प्रत्यार्पणाला विरोध करणारी याचिका फेटाळली. प्रत्यार्पणाचा आदेश योग्य होता हे सिद्ध करण्यासाठी भारताने राणाविरुद्ध पुरेसे पुरावे सादर केले आहेत, असे कोर्टाने म्हंटले आहे.
२६/११च्या हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपपत्रात राणाच्या नावाचा समावेश केला होता. त्याच्यावर पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) आणि दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा सक्रिय सदस्य म्हणून काम केल्याचा आरोप आहे. राणाने मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड डेव्हिड कोलमन हेडलीला मदत केल्याचेही आरोपपत्रात म्हटले आहे, ज्याने हल्ल्यासाठी मुंबईतील ठिकाणांचा शोध घेतला होता.
२६/११ मुंबई हल्ल्यानंतर एका वर्षानंतर FBI ने शिकागो येथून राणा याला अटक केली होती. राणा आणि त्याचा मित्र डेव्हिड कोलमन हेडली या दोघांनी मुंबईतली हल्ल्याच्या ठिकाणांची रेकी केली होती. त्यानंतर दहशतवाद्यांनी हे हल्ले केल्याचे तपासात समोर आले होते. राणा आणि त्याचा सहकारी डेव्हिड कोलमन हेडली यांनी मिळून मुंबई हल्ल्याच्या ठिकाणांचा शोध घेतला होता आणि हल्ले करण्यासाठी पाकिस्तानी दहशतवाद्यांची ब्लू प्रिंट तयार केली होती.
न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रत्यार्पण करारामध्ये नॉन-बीस इन इडेम अपवाद आहे. जेव्हा आरोपीला त्याच गुन्ह्यातून आधीच दोषी ठरवण्यात आले आहे किंवा निर्दोष मुक्त केले गेले आहे, तेव्हा हे लागू होते. राणाविरुद्ध भारतात लावण्यात आलेले आरोप हे अमेरिकी कोर्टात चाललेल्या खटल्यांपेक्षा वेगळे आहेत. त्यामुळे idem अपवादामध्ये गैर-बीआयएस लागू होत नाही.
दरम्यान, मुंबईत पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यामागे पाकिस्तानची गुप्तहेर संघटना असल्याचा दावा करण्यात येतो. त्यासाठी अनेकांनी मदत केली होती. या हल्ल्यात एकूण 166 जणांना प्राण गमवावे लागले होते. यामध्ये काही परदेशी नागरिकांचा पण मृत्यू झाला. त्यात सहा अमेरिकन नागरिकांचा समावेश आहे. न्यायाधीशांच्या पीठाने राणावर जे आरोप लावण्यात आले आहे, त्याच्या पुढील तपासासाठी त्याचे प्रत्यार्पण आवश्यक असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. तीन न्यायाधीशाच्या पीठाने हा निकाल दिला आहे.