आधुनिक जीवनशैलीसाठी प्राचीन उपाय!

पतंजली आयुर्वेद कशी घेत आहे तुमच्या आरोग्याची काळजी? जाणून घ्या

by Team Satara Today | published on : 25 March 2025


आजच्या धावपळीच्या जीवनात आपले शरीर निरोगी ठेवणे हे मोठे आव्हान बनले आहे. निरोगी शरीरासाठी लोक नवनवीन पद्धती अवलंबत आहेत. यामध्ये योगासने, योग्य खाण्याच्या सवयी आणि आयुर्वेदिक उपचारांचा समावेश करत असल्याचे दिसून येत आहेत. तर आता लोक आधुनिक जीवनशैलीसाठी प्राचीन उपायांचा अवलंब करू लागले आहेत. यासाठी पतंजली आयुर्वेद लोकांच्या आरोग्याची काळजी घेत आहे. योगगुरू बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनी स्थापन केलेल्या पतंजली आयुर्वेदने आयुर्वेदिक उत्पादने आणि उपचारांद्वारे लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे.

पतंजली आयुर्वेदाचा  दावा आहे की, त्याच्या उत्पादनांमध्ये अश्वगंधा, शतावरी, त्रिफळा आणि तुळशीसारखे नैसर्गिक घटक असतात, जे शरीराला आतून मजबूत करतात.  ही उत्पादने केवळ रोग बरे करत नाहीत, तर शरीराची प्रतिकारशक्ती देखील वाढवतात. पतंजली म्हणते की, पतंजली आयुर्वेद केवळ शारीरिक आरोग्यापुरता मर्यादित नाही, तर तो मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यालाही महत्त्व देते.

उत्पादने पर्यावरणपूरक आहेत – पतंजली 

पतंजलीची उत्पादने पर्यावरणपूरक असल्याचा कंपनीचा दावा आहे. ते नैसर्गिक संसाधनांचा वापर करून तयार केले जातात, ज्यामुळे पर्यावरणावरील नकारात्मक प्रभाव कमी होतो. योग आणि ध्यान यांच्याशी आयुर्वेदिक उपचारांची सांगड घालणे, शरीर आणि मन यांच्यात संतुलन स्थापित करते. त्याचबरोबर पतंजलीच्या ग्राहकांचा विश्वास आहे की, पतंजली उत्पादनांचा वापर करून आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडून आले आहेत. या उत्पादनांचा वापर करून त्यांची ऊर्जा आणि प्रतिकारशक्ती सुधारल्याचे अनेकांनी नोंदवले आहे.

आयुर्वेदिक उत्पादनांची वाढत आहे मागणी

खरे तर आयुर्वेदाशी संबंधित सर्व उत्पादने आरोग्याच्या क्षेत्रात नवी क्रांती घडवून आणत आहेत. अशी उत्पादने केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर लोकप्रिय होत आहेत.यामुळे आयुर्वेदिक उत्पादनांची मागणी वाढत आहे, कारण लोकांना त्यांचे आरोग्य नैसर्गिक आणि सुरक्षित मार्गाने सुधारायचे आहे. या उत्पादनांच्या लोकप्रियतेमुळे आयुर्वेदिक उद्योगही वाढत आहेत, त्यामुळे रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होत असल्याचे चित्र आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वाढदिवसानिमित्त हार, बुके, शाल-श्रीफळ आणू नये
पुढील बातमी
प्रशांत कोरटकरची तीन दिवस पोलिस कोठडीत रवानगी

संबंधित बातम्या