शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा, बच्चू कडूंना न्याय द्या...

अजित पवारांच्या कार्यक्रमात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ

by Team Satara Today | published on : 14 June 2025


पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यातील पुणे मॉडेल स्कूल व मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकार्पण सोहळा कार्यक्रमात बोलत असतांना प्रहार शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याची घटना घडली आहे. यावेळी अजित पवार यांनी आम्ही पण शेतकरी आम्हाला सुद्धा शेतकऱ्यांची जाण आहे. चर्चा करून निर्णय घेतला पाहिजे. असं म्हणत कार्यकर्त्यांना समज दिली.  

कार्यकर्त्यांनी अजित पवार यांचा समोर राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, बच्चू कडूंना न्याय द्या अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. बच्चू कडू यांनी ८ जूनपासून गुरुकुंजात राष्ट्रसंतांच्या महासमाधीपुढे  शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतमजूर, दिव्यांग, ग्रामपंचायत कर्मचारी आदींसाठी अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे. मात्र आज अजित पवार यांच्या कार्यक्रमात  कार्यक्रत्यांनी गोंधळ घातल्यानंतर पवार यांनी त्यांच्याशी संवाद साधला

ते म्हणाले,बच्चू कडू यांच्या मागण्याववर बैठक घेऊन विचार करण्यात येणार आहे.  बावनकुळे यांनी कालच त्यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. लवकरच यावर बैठक घेण्यात येणार आहे. तर या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला शेतकरी उपस्थित होत्या. यावेळी आंदोलनकर्त्यांनी कार्यक्रम स्थळावर ठिया मांडला. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
माझ्या गद्दारीवर बोलणार्‍यांनी किती पक्ष बदलले? : ना. शंभूराज देसाई
पुढील बातमी
पावसाळ्यात कोकणात जाताय ! जरा जपून !!

संबंधित बातम्या