सातारा : ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरविण्याचा मान म.सा.प., शाहुपुरी शाखा व मावळा फौंडेशन, सातारा यांना मिळाला आहे. ३२ वर्षानंतर हे संमेलन साताऱ्यात होत आहे. जिल्हयातील सर्व साहित्यीक, आम्ही पुस्तक प्रेमी ग्रुप, नगरवाचनालय सातारा, म.सा.प शाहुपुरी शाखेचे सभासद, प्राध्यापक, शिक्षक, सर्व दैनिकाचे संपादक, पत्रकार, प्रिंट मिडीया व इलेक्ट्रीक मिडीयाचे पत्रकार यांच्या सहभागाने हे संमेलन यशस्वी करायचे आहे.
याबाबत प्राथमिक नियोजनाची बैठक बुधवार, दि. २५ जुन रोजी दु.३.३० वाजता नगर वाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
या बैठकीस सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन म.सा.प.शाहुपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत यांनी केले आहे.