सातारा : विलासपूर व गोळीबार मैदान परिसरातील 300 विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे दप्तर, वही, कंपास यासारख्या शालेय साहित्याचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या वेळी माजी प्राचार्य जे. एस. पाटील सर यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थी घडविणाऱ्या ज्ञान मंदिरांना सक्षम करण्याचे काम संग्राम बर्गे आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार करीत आहे. मातृभाषातून मिळालेल शिक्षण जास्त प्रभावी असते. ते टिकवण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. गोळीबार मैदान व इंदिरानगर या दोन्हीही शाळा संग्राम बर्गे यांनी दत्तक घेतले असून, डिजिटल क्लासरूम व शैक्षणिक त्याच्या सुविधा शिवाय स्पर्धेच्या युगात इथला विद्यार्थी पाठीमागे राहू नये. यासाठी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्रपरिवार यांच्यावतीने दरवर्षी विविध लोकोपयोगी उपक्रम राबविले जातात आणि हे उपक्रम निश्चित कौतुकास्पद आहेत.
यावेळी किरण नलवडे, प्रा. प्रकाश सुतार, आबा शिंदे, संजय सूर्यवंशी, सुवर्णाताई पाटील, सुजाताई पाटोळे, संजय चव्हाण, मुकुंद पवार, अमोल करडे, विक्रम पवार, विजय पवार, दीपक सुतार, महेश चौगुले, दीपक सातपुते, गणेश नलवडे, निलेश पाटील, रोहन भोसले, आधी उपस्थित होते.