मुंबई : इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या अंडर-19 सामन्यांमध्ये वैभव सूर्यवंशीने केलेल्या तुफानी खेळीमुळे भारतीय संघाने इंग्लंडवर विजय मिळवला. वैभवने 19 चेंडूत 48 धावांची खेळी केली, तर कनिष्क चौहानने भेदक गोलंदाजी करत 3 विकेट्स घेतल्या. या योगदानाच्या बळावर भारताने इंग्लंडला 6 विकेट्सने हरवले. वैभव सूर्यवंशीने इंग्लंड अंडर-19 टीमविरुद्धच्या पहिल्या यूथ वनडेमध्ये 19 चेंडूत 48 धावांची तुफानी खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 5 षटकार आणि 3 चौकार मारले. त्याचा स्ट्राइक रेट 252.63 होता. तो केवळ 2 धावांनी अर्धशतक हुकले. इंग्लंड संघाचा 6 विकेटने पराभव केला.
इंग्लंडने दिलेल्या 175 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशीने कर्णधार आयुष म्हात्रेसोबत पहिल्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केली. आयुष म्हात्रेने 30 चेंडूत 21 धावा केल्या. या दोघांच्या भागीदारीनंतर भारतीय संघाची मधली फळी थोडी अडखळली, पण शेवटी भारताने 6 विकेट्सने विजय मिळवला.
कनिष्क चौहानने गोलंदाजीमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केले. त्याने 10 षटकांत केवळ 20 धावा देऊन 3 महत्त्वपूर्ण विकेट्स घेतले. कनिष्कच्या प्रभावी गोलंदाजीमुळे इंग्लंडला 174 धावांवर रोखण्यात यश आले. हेनिल पटेल, आरएस अंबरीश आणि मोहम्मद इनाम यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. इंग्लंडच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली, पण मधल्या फळीतील फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकले नाहीत. रॉकी फ्लिंटॉफने सर्वाधिक 90 चेंडूत 56 धावा केल्या.
इंग्लंड अंडर-19 टीमविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात वैभवने इंडिया अंडर-19 साठी 48 धावांची तुफानी खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 5 षटकार आणि 3 चौकार मारले. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 251.63 होता. तो फक्त 2 धावांनी अर्धशतक हुकला. इंग्लंडने दिलेल्या 175 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशीने कर्णधार आयुष म्हात्रेसोबत पहिल्या विकेटसाठी 71 धावांची दमदार भागीदारी केली. वैभव सूर्यवंशीच्या या शानदार फलंदाजीमुळे टीम इंडियासाठी लक्ष्य सोपे झाले. तर आयुष 30 चेंडूत 21 धावा करून बाद झाला.