12:21am | May 22, 2020 |
सातारा: कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील कंपन्यांना उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारे जिल्हाधिकार्यांनी काम सुरू करण्यास परवानगी दिली आहे. असे असताना खंडाळा तालुक्यातील लेबर ठेकेदार व माफियांनी चक्क जिल्हाधिकार्यांच्या आदेशालाच कोलदांडा घातल्याचे समोर आले आहे. परजिल्हयातील कामगारांवरांना खंडाळ्यात आणून ऐन कोरोनात खंडाळकरांना घोर लावल्याने त्या ठेकेदारासह कंपनी व्यवस्थापनावर तात्काळ जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी खंडाळा तालुक्यातून होवू लागली आहे.
खंडाळा तालुक्यातील कंपन्या स्थानिक पुढारी, गुंड तसेच लेबर ठेकेदारांचे चरण्याचे कुरण झालेली आहेत. कंपनी व्यवस्थापनाशी संधान साधून जिल्ह्यातील अनेक नामचिन पुढारीही दरमहा लाखो रूपये पदरात पाडून घेतात. पैशाची चटक लागल्याने माणुसकीला काळीमा फासण्याच्या घटनाही या टोळक्यांमुळे यापूर्वी घडलेल्या आहेत. देशाची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील राज्य शासनाने राज्यातील कंपन्या योग्य खबरदारी घेवून सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गेल्यास आठवड्यात कंपन्या आस्थापनांना 33 टक्के मनुष्यबळाच्या आधारे काम करण्यास परवानगी दिली आहे. मात्र जिल्ह्यातील परप्रांतीय कामगारांनी कोरोना संसर्गामुळे 'गड्या आपला गावच बरा' असे म्हणत सातारा जिल्ह्याकडे पाठ फिरविल्याने कंपन्यांमध्ये कुशल मनुष्यबळाची कमतरता भासू लागली आहे. खंडाळा तालुक्यातील लेबर ठेकेदारांनी पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्हयात बेकायदा कामगार आणण्याचा फंडा अवलंबल्याने खंडाळा तालुकयातील जनतेची मात्र पाचावर धारण बसलेली आहे. खंडाळा तालुकयातील केसुर्डी गावच्या हद्दीत असणार्या एशियन पेंटस् या कंपनीने 'बंड्या' नावाच्या ठेकेदाराला हाताशी धरून पोलीस व महसूलातील वरिष्ठ अधिकार्यांना पैशांची पाकीटे पुरवून पुणे शहरातून सुमारे पंधरा कामगार जिल्हाधिकार्यांचा आदेश डावलून खंडाळा नजिक असणार्या राजावत या हॉटेलमध्ये वास्त्यास ठेवले. स्थानिकांना याची कुणकुण लागल्याने त्यांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी राजावत या हॉटेलवर परवा दि.18 छापा टाकला. यावेळी विनापरवाना या हॉटेलमध्ये राहत असलेल्या मोहित गुप्ता, तपास पटनायक, चंद्रभुषण कुमार, चंद्रप्रकाश नंदवाला, पंकज सिंह, संदिप सिंग बब्बर, बिपीनकुमार, तेजस्वी जगताप, आकाश त्यागी, प्रविण चंदेल, सुमन नाग, निखील वळुंज, दिपक चौधरी, सनित गांधी, राजन बहाद्दुर या सध्या पुण्यात राहणार्या परंतु परप्रांतिय असणार्या कामगारांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई केली आहे. तसेच त्यांच्याकडून काही वाहनेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. परजिल्यातील नागरिकांना जिल्ह्यात येण्यासाठी शासकीय परवाना मिळविण्यासाठी मोठ्या दिव्यातून जावे लागत आहे. असे असतानाही हे पंधरा कामगार कोणाच्या मेहरबानीने खंडाळ्यात आले? जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने जिल्ह्यातील हॉटेल्स व लॉजिंग बंद करण्यात आले आहेत. असे असताना केसुर्डी गावच्या हद्दीत महामार्गालगत असणार्या 'राजावत' या हॉटेलमध्ये हे पंधरा कामगार गेली पाच ते सहा दिवस राहत होते. त्यामुळे या कामगारांना खंडाळ्यात कोणी आणले हे, खंडाळा तालुकयातील लहान मुलही सांगू शकते परंतु पोलिसांनी या कामगारांवर थातूरमातूर कारवाई करीत त्यांना इन्स्टीट्युशनल क्वारंटाईन केले आहे. क्वॉरंटाईननंतर हे पुन्हा कंपनीत हजर होतील परंतु यातील एकजणही कोरोनाबाधित निघाला तरी संपूर्ण खंडाळा तालुक्याला वेठीस धरावे लागणार आहे. त्यामुळे पोलिसांनी स्वत:चे पाप लपविण्यासाठी व त्या ठेकेदाराला वाचविण्यासाठी मोठी पराकाष्ठा केलेली आहे. परंतु सातारा जिल्हाच्या कार्यतत्पर जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी या घटनेच्या तळाशी जावून विना परवाना जिल्ह्यात कामगारांना आणणार्या बंड्या-खंड्याच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणीही खंडाळा तालुक्यात होवू लागली आहे.
खंडाळा तहसिलदारांची भूमिका संशयास्पद
केसुर्डी ता.खंडाळा हद्दीत असणार्या राजावत या हॉटेलमध्ये सुमारे 15 परप्रांतिय कामगारांचे वास्तव्य असल्याचे निदर्शनास आल्यानंतर खंडाळा तालुक्यात एकच खळबळ उडाली. खंडाळा तालुकयातील जागरूक नागरिकांमुळे हा प्रकार उघडकीस आला असला तरी खंडाळा तहसिलदारांची याबाबतची भूमिका मात्र संशयास्पद आहे. एशियन पेंटस् आणि खंडाळा तहसिलदारांचे संबंध पाहता नक्कीच दाल मे कुछ काला ऐवजी पुरी दालही काली है अशा चर्चाही खंडाळा तालुक्यात छडत असून सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या प्रकरणात लक्ष घालून खंडाळा तहसिलदारांची चौकशी करून सत्यकारण उजेडात आणावे अशी मागणीही होवू लागली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |