12:47pm | Mar 05, 2021 |
अजित जगताप
सातारा; जिथे आभाळ फाटले असताना ठिगळ कुठे-कुठे जोडायचे? अशी राज्य सरकारच्या कारभाराची अवस्था झाली आहे. शेतकर्यांना सलग चार वर्षे सरकारी पुरस्कारापासून वंचित राहावे लागले आहे. काही राजकीय नेते व निष्क्रिय अधिकारी वर्ग यांच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी टीका शेतकरी संघटनेचे नेते बाळासाहेब चव्हाण, पंजाबराव पाटील व मान्यवरांनी केली आहे.
याबाबत माहिती अशी की, राज्य सरकारच्या कृषि विभागाच्या वतीने प्रगतशील व प्रयोगशील निवडक शेतकर्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नऊ प्रकारच्या पुरस्कारांची घोषणा करून सन्मानाने शेतकर्यांना पुरस्कार दिला जातो. यामुळे कर्जबाजारीपणा, दुष्काळग्रस्त, अतिवृष्टीग्रस्त व नापीक, नैसर्गिक आपत्ती याचे रडगाणे न गाता काही शेतकरी खडकाळ जमिनीवर सुध्दा पीक उत्पादन चांगले घेतात. त्याची प्रेरणादायी कहाणी इतर शेतकरी बांधवांना समजावी. त्यांच्या मनात जिद्द निर्माण व्हावी यासाठी या पुरस्काराला अन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.
सातारा जिल्ह्यातील काही शेतकर्यांनी गेली चार वर्षांपासून विविध प्रकारची माहिती व शिफारशी सह राज्य सरकारला प्रस्ताव मंजूरीसाठी पाठविले आहेत. परंतु 2017 पासून शेतकरी पुरस्काराचे वितरण झाले नाही. याबाबत, सातारा जिल्ह्यातील राजकीय नेते, कृषि अधिकारी व कृषी विभागात लाळगोठेपणा करणार्यांनी आत्मचिंतन करण्याऐवजी गुणगान गाऊन घेण्यास धन्यता मानत आहे. अशी टीका सातारा, वाई, खटाव, माण, कराड, फलटण, कोरेगाव येथील सामान्य शेतकरी करीत आहेत. यापूर्वी सातारा जिल्ह्यात शेतीमित्र, शेतीनिष्ठ, कृषि सेवा रत्न, कृषि भूषण, कृषि अधिकारी व कर्मचार्यांनाही पुरस्कार मिळाला आहे. परंतु, अलिकडे ‘तीन तिघाड काम बिघाड’ अशी तीन चाके (महा आघाडी) सत्तेत सहभागी करून घेतली आहे तर प्रमुख विरोधी पक्षाची अवस्था वाहनाच्या ‘स्टेपनी’ सारखी झाली आहे. वाहनाचा टायर कधी नादुरुस्त होतोय याची वाट पाहात आहे. त्यामुळे पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर केलेल्या शेतकर्यांनी कोणाला जाब विचारला पाहिजे?याचा उलगडा होत नाही.
मुंबईत सध्या विधान भवनात अधिवेशन सुरू आहे. कोविड महामारीच्यामुळे खबरदारीच्या उपाय योजना आखली आहे. आमदार, अधिकारी व कर्मचारी तसेच मोजक्याच मंडळींना विधान भवनात कोविड चाचणी केल्यानंतर प्रवेश दिला जात आहे. याचा लाभ घेऊन काही महाभाग आप-आपल्या पध्दतीने विधान भवनातील कामकाजाची माहिती स्थानिक पातळीवर देत आहेत. त्याच्या सत्यतेबाबत मतदारसंघात जाणकार व्यक्तींकडून शंका उपस्थित केली जात आहे. हा भाग वेगळा असला तरी राज्यातील लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी आणि शेतकरी संघटनेचे नेते यांनी कृषि पुरस्काराचे वितरण लवकर करण्यात यावे यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावा अशी माफक अपेक्षा पुरस्काराची प्रतीक्षा करणारे सातारा जिल्ह्यातील शेतकरी व हितचिंतक करू लागले आहेत.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |