12:57pm | Sep 14, 2021 |
पुसेगाव : कोरोनामुळे सर्वच क्षेत्राला फटका बसला असून, शेती व्यवसाय आणि शेतकरीही सुटला नाही .एकेकाळी बटाटा पिकाचे आगार समजल्या जाणाऱ्या खटाव तालुक्यातील पुसेगाव व परिसरात दीड दोन हजार हेक्टर क्षेत्रावर होणारी बटाटा पिकाची लागण यंदा मात्र केवळ चारशे ते पाचशे हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. महाराष्ट्रात खेड मंचर नंतरची बटाटा बियाणे विक्री व खरेदीची खटाव तालुक्यातील पुसेगाव ही दुसरी प्रमुख बाजारपेठ आहे. ज्या बाजारपेठेतून दरवर्षी ५०० ते ७०० ट्रक बटाटा बियाणे विक्री होत होते, तेथे यावर्षी केवळ सुमारे ४० ट्रकच बियाण्याची विक्री झाली. त्यामुळे भांडवली असलेल्या बटाटा पिकाचे क्षेत्र कमी होऊन सोयाबीन व वाटाणाच्या शेती क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
खटाव तालुका अवर्षण प्रवण क्षेत्रात असला तरी, या तालुक्याचा उत्तर भाग हा उंच पठारावर आहे. येथील थंड हवामान बटाटा पिकास पोषक असल्याने पुसेगाव परिसरातील असंख्य गावे व वाड्या वस्त्यावरील शेतकरी बटाटा पीक मोठ्या प्रमाणात घेत होते. तसेच या बाजारपेठेत त्यावेळी खात्रीशीर बटाटा बियाणे मिळत असल्याने सांगली, विटा, खानापूर, कोरेगाव, कराड, सातारा, फलटण या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात याच बाजारपेठेतून बियाणांची खरेदी होत होती.
बटाटा हे तीन महिन्यांचे पीक आहे, कमी कालावधीचे आणि दसरा, दिवाळी सणाला शेतकऱ्यांना "नोटा " मिळवून देणारे पीक असल्याने बऱ्याच वर्षांपासून याभागात शेतकरी बटाटा पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर करत होते. खरीप हंगामातील इतर पिकांच्या तुलनेत बटाटा हे भांडवली पीक आहे.
पूर्वी 'शेतीत काहीही पेरले तरी उगवणारच' या भावनेतून शेतकरी कमी खर्चात कोणतेही पीक व्यवस्थीतरित्या पदरात घेत होता.मात्र सध्या निसर्गाच्या बिघडलेल्या समतोलामुळे या पिकाला जे पाहिजे ते पोषक वातावरण मिळत नाही, उगवण्यापासून ते पीक काढण्यापर्यंतचा आर्थिक भार शेतकऱ्यांना पेलवेनासा झाला आहे .बटाटा बियाणे, लागवड, खते, औषधे, आंतरमशागतीचा खर्च असा एकरी सुमारे ७० ते ८० हजार रुपये खर्च करून ही पुन्हा रोजगारी मंडळींची वानवा असल्याने आयत्यावेळी त्यांची मनधरणी करताना शेतकरी राजा पुरता मेटाकुटीला आला आहे. खर्चाच्या तुलनेत बटाटा पिकाला चांगला भावही मिळाला नाही. तसेच गेल्या दोन -तीन वर्षांपूर्वी याच बाजारपेठेतून बोगस बटाटा बियाणांची विक्री झाल्याने काही शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. सलग गेल्या दोन वर्षी, बटाटा काढण्यावेळी व ऐरणीत बटाटा साठवून ठेवला तरीही झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचा हजारो टन बटाटा जागेवरच नासून गेला, दीड- दोन वर्षांपासून कोरोनाचा गंभीरकाळ असल्याने उत्पादित केलेला बटाटा विक्री करताना शेतकऱ्यांना नाकीनऊ आले. सततच्या लॉक डाऊनने हॉटेल, पर्यटन व्यवसाय बंद, बटाटा मालाच्या प्रक्रिया कंपन्या,मार्केट बंद.
त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादित केलेल्या या भांडवली नाशवंत मालाचे काय आणि कसे करावे हीच चिंता शेतकऱ्यांना भेडसावत होती. होणारे प्रचंड आर्थिक नुकसान टाळण्यासाठी तसेच निसर्गाचा लहरीपणा व कोरोनाचा कहर असाच पुढे राहिल्यास अडचणीत सापडण्याऐवजी बटाटा पिकच नको अशी धारणा शेतकऱ्यांची झाली, असल्याने यावर्षी बटाटा पिकाची लागवड अत्यल्प क्षेत्रावर झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे बटाट्याचे क्षेत्र कमी होऊन शेतकरी बिगरभांडवली सोयाबीन पिकाकडे वळला असल्याचे दिसून येत आहे.
जरी यावर्षी बटाटा पिकाची लागवड कमी झाली असली तरी बाजारपेठेत खाऊ गिऱ्हायिकांना किमान पाच सहा महिने बटाटा कमी पडणार नाही. कारण महाराष्ट्रासह इतर राज्यातील रब्बी हंगामातील बटाटा अद्यापही मोठ्या प्रमाणावर कोल्डस्टोरेज मध्ये पडून आहे. मार्च ते जून या कालावधीत सर्वत्र हॉटेल्स, पर्यटन स्थळे तसेच प्रक्रिया उद्योग कंपन्या बंद असल्याने कोल्डस्टोरेजचा ठेवलेला माल, ज्या गतीने विक्रीसाठी बाहेर निघायला पाहिजे होता. तो अद्यापही निघाला नाही,त्यामुळे अजूनही पाच सहा महिने बटाट्याचे जरी उत्पन्न कमी झाले तरी, बाजारपेठेत सर्वसामान्य लोकांना बटाटा मिळणार आहे.
दोन वर्षापासून होत असलेल्या निसर्गाच्या सततच्या अवकृपेने व कोरोना काळातील लॉकडाऊन मुळे पुसेगाव बटाटा बियाणे बाजारपेठेत होणारी कोट्यवधी रुपयांची उलाढाल यावर्षी मंदावलेली आहे. दोन वर्षांपासून आर्थिक गर्तेत सापडलेला बळीराजा भांडवली पीकाऐवजी इतर पिके घेण्याकडे कल वाढला आहे.शेतकऱ्यांच्या पाठिंब्यावर चालणाऱ्या या पुसेगावच्या बटाटा खरेदी विक्री बाजारपेठेचा रुबाब टिकवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
संतोष तारळकर,
बटाटा बियाणे विक्री व खरेदी व्यापारी ,पुसेगाव
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |