06:15pm | May 27, 2020 |
मुंबई: विरोधी पक्ष जाणीवपूर्वक गोंधळ निर्माण करत आहे. महाविकास आघाडीत सर्व काही ठिक आहे.काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विधानाचा वेगळा अर्थ काढून राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाल्याचे दावे केले जात असताना राज्याचे महसूल मंत्री व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला.
महाराष्ट्रात आम्ही सरकारमध्ये सहभागी असलो तरी निर्णय घेण्याचे अधिकार आम्हाला नाहीत, असे विधान राहुल गांधी यांनी केले होते. या विधानावरून मोठं वादळ उठलं. त्यानंतर गैरसमज वाढू नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राहुल गांधी यांच्यात संवाद झाला. दोन्ही नेते फोनवरून बोलले. यावेळी ’सरकारमध्ये काँग्रेसचा यथोचित सन्मान राखला जाईल. काँग्रेसला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्याची सरकारची भूमिका राहिली आहे. यापुढंही राहील,’ असं मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांना सांगितल्याचं कळतं. तर राहुल गांधी यांनीही काँग्रेस ठामपणे सरकारच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिल्याचे सांगण्यात येते. करोनाच्या संकटाशी लढण्यासाठी काँग्रेस पक्ष सरकारला सर्वतोपरी मदत करेल, असंही राहुल यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीने तातडीची आणि महत्त्वाची पत्रकार परिषद घेतली.
पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पक्षाची भूमिका मांडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार सक्षमपणे आणि एकत्रितपणे काम करत आहे, असे थोरात यांनी सुरुवातीलाच नमूद केले. विरोधी पक्षाकडून आम्ही सहकार्याची अपेक्षा केली होती, मात्र त्यांचं काहीतरी वेगळंच सुरू आहे. असं असलं तरी आम्ही आमची मानसिकता ढळू देणार नाही. महाराष्ट्र करोनामुक्त करून आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या प्रश्नांना उत्तरं देऊ, असे थोरात यांनी बजावून सांगितले.
मुंबईची अवस्था काळजी करण्यासारखी आहे, ही वस्तूस्थिती असली तरी त्यावर मात करण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री स्वत: सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. अत्यंत कमी कालावधीत सर्व सोयींनी सज्ज असं रुग्णालय उभारण्यात आलं आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन त्यानुसार व्यवस्था केली जात आहे. कोणाचीही गैरसोय होणार नाही हे पाहिले जात आहे. असे असताना विरोधी पक्ष जाणीवपूर्वक गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही थोरात यांनी केला.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |