03:43pm | Apr 24, 2021 |
वॉशिंग्टन: कोरोना महामारीने अक्षरक्ष: थैमान घातले आहे. त्यातच एक धक्कादायक खुलासा समोर येत आहे. पुढील मे महिन्यात भारतात करोनाची लाट आणखी जोर पकडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे भारतात दररोज पाच हजार करोनाबाधितांचा मृत्यू होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान भारतातील तीन लाख नागरिकांना करोनामुळे प्राण गमवावे लागण्याची शक्यता आहे.
वॉशिंग्टन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेटरिक्स अॅण्ड एवोल्यूशनच्यावतीने करण्यात आलेल्या संशोधनात हा दावा करण्यात आला आहे. 15 एप्रिल रोजी प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, भारतात करोनाच्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी भारतात लसीकरण मोहिमेवर भर देण्यात येणार असल्याचे म्हटले. भारतात आगामी दिवसात परिस्थिती आणखी बिकट होणार असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली. या संशोधनासाठी भारतातील मृत्यू आणि संसर्गाच्या दराचा अभ्यास करण्यात आला. यावर्षी मे महिन्याच्या मध्यात भारतातील करोना बळींची संख्या 5600 इतकी होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
12 एप्रिल ते 1 ऑगस्ट या काळात अतिरिक्त तीन लाख 29 हजार मृत्यू होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वॉशिंग्टन विद्यापीठाच्या संशोधनानुसार, सप्टेंबर 2020 ते फेब्रुवारी 2021 या दरम्यानच्या काळात भारतात करोनाबाधितांच्या दररोजच्या संख्येत घट होती. मात्र, आता त्यात वाढ होताना दिसत आहे. दररोज करोनाबाधित आढळण्याचा दर मागील वर्षीच्या सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत या एप्रिल महिन्यात दुप्पट असल्याचे दिसून आले आहे.या संशोधनानुसार, देशव्यापी लसीकरणामुळे जुलै महिन्याच्या अखेरिस 85 हजार 600 जणांचे प्राण वाचवले जाऊ शकतात.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |