08:41pm | May 26, 2023 |
सातारा : शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन पर लाभ देण्याची योजना मागील वर्षापासून सुरू केली. या योजनेअंतर्गत मागील 10 व महिन्यांमध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या एक लाख 91 हजार 548 शेतकऱ्यांना 677.85 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. मात्र अद्यापही आधार प्रमाणित केलेले 24 हजार 578 शेतकरी प्रोत्साहन पर रकमेच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे आम्ही नियमित कर्ज थकवले असते तर बरे झाले असते, अशी प्रतिक्रिया काही शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत एक एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीत उचल केलेले दोन लाखापर्यंतचे पीक कर्ज शासनाने माफ केले होते, तर नियमित कर्ज भरणाऱ्यांना शेतकऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार होता. परंतु आतापर्यंत एक लाख 91548 शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे, तर 24000 शेतकरी प्रोत्साहन रकमेच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यातील एक लाख 91 हजार 548 शेतकऱ्यांच्या खात्यात 677.85 कोटी रुपये इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना लाभ आधार प्रमाणीकरण केलेल्या दोन लाख 16 हजार 126 शेतकऱ्यांपैकी एक लाख 91 हजार शेतकरी लाभार्थी ठरले. मात्र आधार प्रमाणीकरण पूर्ण करूनही 24 हजार 578 शेतकरी अद्यापही या प्रोत्साहनपर रकमेच्या प्रतीक्षेत आहेत. कृषी विभागाकडून या संदर्भात अद्याप कोणताही निरोप आला नसल्याने प्रोत्साहन पर अनुदानाची गोची झाली आहे. शासनाने घोषित केलेला प्रोत्साहन भत्ता नव्या हंगामात मिळण्याची अपेक्षा नव्हती. मात्र हंगाम तोंडाला तरी जिल्ह्यातील दहा हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहन व त्याचे प्रतिक्षा आहे. यंदा आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले. थकीत प्रोत्साहन भत्ता त्वरित देण्यात यावा, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर |
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर |
प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीसाठी रमेश उबाळे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण |
केंद्रीय गृहमंत्री अजयकुमार मिश्रा उद्या सातारा जिल्हा दौऱ्यावर |
साताऱ्यात ८ रोजी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचा मेळावा |
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी |
माहिती अधिकार दिन 27 सप्टेंबर रोजी होणार साजरा |
शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत |
चार मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर |
व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी |
खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन! |
अँटीकरप्शनच्या उज्वल वैद्य यांची मुंबईला बदली |
एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
जबरी चोरीसह खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघातासह गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा |
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी |
माहिती अधिकार दिन 27 सप्टेंबर रोजी होणार साजरा |
शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत |
चार मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर |
व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी |
खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन! |
अँटीकरप्शनच्या उज्वल वैद्य यांची मुंबईला बदली |
एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
जबरी चोरीसह खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघातासह गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा |
अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या |
मोटर सायकल वरून पडून एकाचा मृत्यू |
सातारा शहरातील 61 जणांवर तडीपारीची कारवाई |
इलेक्ट्रिक मोटार चोरणारी टोळी सातारा जिल्ह्यातून तडीपार |
नमस्कार सातारकर, हे आहे हिंदवी 89.6... |