(प्रकाश राजेघाटगे)
बुध: विजयोत्सव बाजूला ठेवून जनतेच्या मनातील प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी लोकनेत्याचा जन्म होत असतो आणि हा प्रयत्न लोकनेते (कै.) हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांनी जोपासला. 13 महिन्याच्या खासदारकी काळात सामान्य लोकांच्या जिव्हाळाचे प्रश्न भाऊंनी लोकसभेत मांडले. मग प्रश्न असो कृष्णा खोरे विकास महामंडळाचा किंवा फलटण-पुणे रेल्वे प्रकल्प अंमलात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा॥॥ आणि त्याचाच परिपाक म्हणजे 25 वर्षांनी फलटण व्हाया लोणंद ते पुणे ही रेल्वे धावली. बापाने दिलेले वचन पाळणारा खा.श्री.रणजितसिंह नाईक निंबाळकर ह्या आधुनिक श्रावण बाळाची नोंद इतिहासात होईल, असे स्पष्टपणे जाणवते पण हा इतिहास झाला कालपर्यंतचा!!!!!!! भविष्यात हाच लोकप्रतिनिधी हिंदुस्तानच्या मंत्रीमंडळात दिसला तर कोणी तोंडात बोटे घालू नये याला कारण आहे.ती या व्यक्तीची दिलेल्या कामाबद्दलची निष्ठा व बांधिलकी!!!!!!!
2019 ची माढा लोकसभा निवडणूक त्या अर्थाने विशेष म्हणावी लागेल. देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार यांचे नेतृत्व मानणारा हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे होता. जवळ-जवळ शरद पवार या मतदारसंघातून निवडणूक लढविणार हे फिक्स झाले होते, पण ऐनवेळी पार्थ पवारांच्या मावळ लोकसभेतील उमेदवारीवरुन शरद पवार यांनी माघार घेतली (एका घरातील अनेक उमेदवार नको या विषयावर) व माढा लोकसभेची उमेदवारी संजय शिंदे यांनी मिळाली. विरोधात होते नवखे रणजितसिंह नाईक निंबाळकर....मतदारसंघ नवा असूनही नाईक निंबाळकर यांनी बाजी मारली. आणि लोकसभेत भाजपाचे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची निवड झाली.
माजी कृषीमंत्री यांच्या मतदारसंघात निवडून आलो म्हणून कुठल्याही प्रकारच्या सत्काराचे भोक्ते ते झाले नाहीत उलट जनतेच्या प्रश्नांवर ते रस्तावर उतरून नेहमीच आक्रमक झाले. याच दरम्यान झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले. आणि पश्चिम महाराष्ट्रात भाजपला ओहोटी लागली. पदवीधर मतदारसंघात झालेला पराभव व नंतरच्या काळात सांगली महानगरपालिकेत ओढवलेला पराभव पाहता नेहमीच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना दोषी ठरवले जाऊ शकत नाही कारण सत्तेच्या सारीपाटावर नेहमीच सत्तेवर राहिलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना विरोधी पक्षाचा भार सोसवणार नाही कारण राजकीय भूमिकेशी वारंवार तडजोडी सत्तेसाठी येथे केल्या जातात म्हणून तर पुलोद निर्मिती याच भागातील नेत्यांने केली हे विसरून चालणार नाही.
म्हणून तर नामदार म्हणून रणजितसिंह योग्य
वरील सर्व गोष्टींचा अभ्यास करता पश्चिम महाराष्ट्रात केंद्रीय सत्तेचे पद मिळणे महत्त्वाचे आहे, यामध्ये रणजितसिंह निंबाळकर योग्य रीतीने बसतात, कारण राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध येथे महत्त्वाचा आहे. पुणे-कोल्हापूर येथील साठ विधानसभा मतदारसंघातील ताकदीला विरोध करण्यासाठी एका ठाम मंत्राची गरज भाजपला आहे म्हणून तर प्रकाश जावडेकर पुण्याचे असूनही पश्चिम महाराष्ट्रात ते गणले जावू शकत नाहीत. यावर उपाय म्हणून मंत्रिमंडळ विस्तारात रणजितसिंह निंबाळकर यांची वर्णी लागू शकते कारण पुणे ग्रामीण ते सोलापूर-सांगली ते सातारा या भागात त्यांचा थेट परिचय आहे आणि याच परिसरात भाजपाने सत्तेवर मांड ठोकली तरच येत्या काळात महाराष्ट्रात एकहाती सत्तेचे सोपान पार करु शकतात कारण एकच
डर के आगे जीत हैं
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |