09:28pm | Mar 05, 2021 |
सातारा : सध्या सातारा शहरातील रस्त्यांवर शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ठिकठिकाणी पोलीस वाहने अडवून कागदपत्रांची मागणी करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे वाहनचालकाला मानसिक त्रास होण्यासह आपल्या अमुल्य वेळेला मुकावे लागत असल्यामुळे पोलिसांना विनाकारण वाहन अडविण्याचा अधिकार आहे का? याबाबत वाहनचालकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. दरम्यान, पोलिसांचा त्रास होत असल्यामुळे सातारा जिल्ह्याच्या तत्कालीन पोलीस अधीक्षक सातपुते यांचा 'तेजस्वी' पायलट प्रोजेक्ट साताऱ्यात पुन्हा एकदा राबवा, अशी मागणी वाहनचालकांमधून होऊ लागली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, सातारा शहरातील पोवई नाका, बसस्थानक, बॉम्बे रेस्टॉरंट परिसर, राजवाडा, राधिका रोड, देगाव फाटा, मोळाचा ओढा, अजिंठा चौक परिसर, वाढे फाटा या परिसरात सकाळी दहा वाजल्यापासूनच वाहतूक पोलिस विनाकारण दुचाकी, चारचाकी वाहने अडवित आहेत. वाहन थांबल्यानंतर चालकाकडे वाहन चालवण्याचा परवाना, पीयूसी, पासिंग संदर्भात कागदपत्रांची मागणी केली जाते. आरसा, इंडिकेटर नसल्याचा पोलीस जावई शोध लावत आहेत. यामुळे वाहन चालकांना नाहकपणे मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. या संपूर्ण प्रकारामुळे महिलावर्गात संतापाचे वातावरण निर्माण झाले. आता तर ३१ मार्च जवळ येऊ लागल्यामुळे वाहनचालक शहरातील बोळा-बोळातून मार्ग शोधत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. वाहनचालकांना आरोपी सारखी वागणूक दिली जात असल्यामुळे वाहन अडवण्याचा अधिकार पोलिसांना आहे का? यासारखे अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत.
पोलिसांनी गाडी अडवल्याच्या घटना आपण नेहमीच बघत असतो. गाडी अडवल्यानंतर कागदपत्रांची मागणी संबंधित पोलीस करतो आणि तुमच्या त्रुटी शोधायला सुरुवात करतो. अशातच एखाद्याला मोठ्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. यामुळेच सातारच्या तत्कालीन आणि सोलापूर विद्यमान पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी नवीन आदेश काढला आहे.
राष्ट्रीय महामार्ग किंवा राज्य महामार्ग यावर नियमांचे उल्लंघन करणार्या विरुद्ध कारवाई करायची. मात्र, विनाकारण गाडी थांबवून त्रास देणार्या पोलिसांना आता अधीक्षकांनी चांगलेच बजावले आहे. जर विनाकारण कोणी गाडी थांबवली तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. नाकाबंदी करताना संबंधित माहितीही पोलीस स्टेशनच्या दैनंदिनीमध्ये नोंद करून कंट्रोल रूमलाही त्याची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. विनाकारण कोणत्या वाहनाला आता थांबवायचे असल्यास कंट्रोल रुमची परवानगी घेणेही बंधनकारक केले आहे. सोलापूर ग्रामीणचे पोलीस अंमलदार विनाकारण कोणत्याही वाहनाला थांबवून त्रास देत असल्याच्या बर्याच तक्रारी आल्यामुळे हे पाऊल उचलले असल्याचे तेजस्वी सातपुते यांनी सांगितले आहे.
परराज्यातील वाहने, दुचाकी, चारचाकी यांना आता पोलिसांकडून विनाकारण काही त्रास होत असेल तर त्यांनी खालील क्रमांकावर आपली तक्रार दाखल करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जनतेला केले आहे. संबंधित क्रमांकावर संपर्क केल्यानंतर तक्रारीमध्ये तथ्य आढळल्यास कडक कारवाई केली जाईल, असे तेजस्वी सातपुते यांनी स्पष्ट केले आहे. तसेच वाहतुकीचे नियम मोडणार्या व्यक्तींनाही अजिबात सोडण्यात येऊ नये आणि कडक कायदेशीर कारवाई करावी, असे आदेशही त्यांनी पोलिसांना दिले आहेत. तेजस्वी सातपुते या स्वतः खोटा चालक पाठवून संबंधित पोलीसांची उलट तपासणी करणार आहेत. त्यामुळे, आता यापुढे पोलिसी खाक्या दाखवून जनतेची लूट करणार्यांची खैर नाही. काही बोटावर मोजण्या एवढ्या लोकांमुळे संपूर्ण पोलीस विभाग बदनाम होतो त्यासाठी ही अंमलबजावणी गरजेची असल्याचे अधीक्षकांनी सांगितले आहे.
तेजस्वी सातपुते सातारात कार्यरत असताना अशा प्रकारच्या सूचना त्यांनी शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांना दिल्या होत्या. तेव्हा दुचाकी, चारचाकी वाहन चालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. त्यांची बदली झाल्यानंतर साताऱ्यात पुन्हा वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वेगवेगळ्या माध्यमातून छपाई सुरू केल्यामुळे वाहन चालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सोलापूर जिल्ह्याच्या धर्तीवर सातारा जिल्ह्यात अशा प्रकारचा निर्णय घेता येतो का? सातपुते यांचा तेजस्वी पॅटर्न सातारा जिल्ह्यात राबवता येईल का? याबाबत नूतन पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
वाहतूक क्रेनवरील कर्मचाऱ्यांची दादागिरी मोडीत काढावी
पार्किंगमधील गाडी वाहतूक शाखेच्या क्रेनमधून उचलून घेऊन जात असताना क्रेनवरील कर्मचारी दादागिरी करत असल्याच्या तक्रारी सातत्याने होत आहेत. हा विषय माध्यमांनी निदर्शनास आणून देऊनही कर्मचाऱ्यांमध्ये कोणताही फरक पडलेला नाही, ही फार गंभीर बाब आहे. कर्मचारी ज्या पद्धतीने दुचाकी उचलून क्रेनमध्ये ठेवत आहे. ही पद्धत अत्यंत चुकीचे असून त्यांच्या या कृत्यामुळे दुचाकींचे नुकसान होत असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे, ही बाबही बंसल यांनी गंभीरपणे घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |