02:40pm | Mar 09, 2021 |
अहमदाबाद: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ आता पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. खर तर कसोटी मालिकेत भारतीय संघाने सर्वोत्कृष्ट कामगिरीची नोंद केली असली तरी आता संघ व्यवस्थापनाची ‘कसोटी’ लागणार आहे. कारण इंग्लंडविरूध्दच्या टी-20 मालिकेसाठी तब्बल 19 जण पात्र आहेत परंतू त्यातून 11 जणांची निवड करावी लागणार आहे. त्यामुळे आता नेमकी संधी कोणत्या खेळाडूला द्यायची असा मोठा प्रश्न भारतीय संघ व्यवस्थापनासमोर निर्माण झाला आहे.
शुक्रवारपासून सुरू होणार्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची निवड कशी होते, हे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, कर्णधार विराट कोहली आणि गोलंदाज प्रशिक्षक भरत अरुण यांच्यावर ठरणार आहे. प्रथम मालिका विजय मिळून मग प्रयोग करण्याचा विचार होऊ शकतो. अशा परिस्थितीत मालिका विजयानंतर कमी अनुभव असलेल्या खेळाडूंना नंतर संधी दिला जाऊ शकते.
भारतीय संघासाठी मालिकेचा निकाल देखील महत्त्वाचा ठरणार आहे. पहिल्या तीन लढतीसाठी एकच संघ असू शकतो. संघात ऋषभ पंतला स्थान मिळण्याची शक्यता आहे. पंतचा समावेश म्हणजे लोकेश राहुलला संधी मिळणार नाही. सलामीवीर म्हणून शिखर धवन आणि रोहित शर्मा हीच जोडी कायम असेल. काही महिन्यांपूर्वी राहुलकडे सलामीचा फलंदाच आणि विकेटकिपर म्हणून पाहिले जात होते. पण आता या दोन्ही जागांसाठी स्पर्धा वाढली आहे.
धवनने विजय हजारे ट्रॉफीत 150च्या जवळ धावा केल्या होत्या. तर रोहित बाबत चर्चा करण्याची गरज नाही. राहुलला संघात सलामीवीर म्हणून संधी दिली तर शिखरला मधळ्या फळीत खेळवावे लागले. राहुल आयपीएलमधील आघाडीचा फलंदाज आहे. अशा परिस्थितीत विराट कोहली तिसर्या क्रमांकावर त्यानंतर पंत पाचव्या आणि मग हार्दिक पंड्या सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतात. अशा स्थितीत फक्त चौथ्या क्रमांकाची जागी शिल्लक आहे. या जागेसाठी श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांच्या स्पर्धा आहे.
गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमार मोठ्या कालावधीनंतर संघात परत येतोय. त्याची स्पर्धा दीपक चाहर आणि शार्दुल ठाकूर यांच्याशी असेल. अनुभव आणि डेथ ओव्हरमधील उत्तम गोलंदाजीच्या जोरावर कुमार पुढे असेल. पण त्याने मुश्ताक अली टी-20 वगळता फार क्रिकेट खेळले नाही. फिरकीपटूंमध्ये युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल ही जोडी संघात दिसू शकते.
त्याच बरोबर टी नटराजन आणि नवदीप सैनी यांना संधी मिळते का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. संघात सर्वोत्तम खेळाडू आहेत आणि या सर्वांना खेळवण्याचे आव्हान संघ व्यवस्थापनापुढे असेल.
इंग्लंडविरुद्ध 12 मार्च रोजी पहिली टी-20 लढत होणार आहे. ही संपूर्ण मालिका अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |
अजित वाकनीस यांचे निधन |