02:29pm | Nov 24, 2022 |
सातारा (महेश माणिक बंडगर) : शासनाने पर्यावरण वाचवण्यासाठी काही योजना सुरू केल्या आहेत. उदाहरण बघायचे म्हटले तर एक झाड तोडले तर त्याच्या करतू बदल्यात दोन झाडे लावायची. पण ती झाडे खरेच जगवली जातात कार पण ते झाड तोडताना साधा विचार नाहीत की त्याबरोबर किती नुकसान करत आहेत त्या झाडाबरोब वने, बरेच वन्यजीव आणि पूर्ण परिसंस्था जोडलेली असते. या सगळ्याचे गांभीर्य शासनाला होत नाही तोपर्यंत पर्यावरणाच कोणतेही भले होण्याची शक्यता नाही. हा जरी मानव आणि वन्यजीव संघर्षचा भाग असला, तरी परिणामाच्या दृष्टीने जास्त भयानक आहे. त्यासासाठी मानव व वन्यजीव संघर्ष थांबवून खऱ्या अर्थाने पर्यावरणवादी जगण्यासाठी सर्वसमावेश प्रयत्नांची गरज आहे.
खरे पाहिले तर जसजसा मानव आधुनिक होत गेला तशी खऱ्या संघर्षास सुरवात झाली मानव आणि प्राणी वन्यजीव यांच्यातील संघर्ष सुरुवातीपासूनच चालत आलेला आहे विचार केला तर, एक सहज लक्षात येईल पूर्वीचा आदिमानव आणि आजचा आधुनिक मानव यांच्यामध्ये सुद्धा खूप बदल आपल्याला बघायला मिळतो तसेच यांच्यामधील संघर्षाची तीव्रता सुद्धा बदललेली दिसून येते. एवढेच नाही तर पूर्वीचा आदिमानव हा बयाच वन्यजीवांवर अवलंबून होता, हा आदि मानव खाण्यासाठी वन्यजीवांची शिकार करायचा आणि आपली अन्नाची गरज सुद्धा भागवायचा तसेच मग हे होत असताना त्यामध्ये कधीकधी वन्यजीवांकडून सुद्धा त्याचीही शिकार व्हायची. तो एक नैसर्गिक स्वरूपाचा संघर्ष होता. किंवा तो मानवाच्या जगण्याचा एक भाग होता तसेच जसजसा मानव हा आधुनिक होत गेला तसतसा खऱ्या संघर्षास सुरुवात झाली.
आत्ताच्या परिस्थितीमध्ये बघायला गेले तर अशी परिस्थिती आहे की, आजच्या मानवाशी कोणत्याही पद्धतीने मुकाबला करणे वन्यजीवांना शक्य नाही. आत्ताचे वन्यजीवांचे संपूर्ण अस्तित्व हे मानवाच्या इच्छेवर अवलंबून असलेले दिसून येते. पण जर एक विचार केला तर लक्षात येईल जर हे वन्यजीवन नष्ट झाले, तर त्याच्याबरोबर परिसंस्था सुद्धा नष्ट होवू लागणार आणि त्याचा परिणाम शेवटी मानव नष्ट होण्यात होणार. याचा विचार कोणीच करत नाही. या सगळ्या चे गांभीर्य फार थोड्या लोकांना आहे. आजचा हा वाढता वन्यजीव संघर्ष हा शहर आणि खेडी या दोन्ही ठिकाणी तितकाच तीव्र असल्याचे दिसुन येते. याचे नेमके कारण काय आहे हे कोणी जाणूनच घेत नाही, हे नेमके कशामुळे होते होत आहे तर शहर आणि खेडी या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत चाललेल्या विकासाच्या पद्धती आणि त्या अगोदर बघितले तर वन्यजीव आणि विकास या दोघांमधील दूरी इतकी मोठी कधीच नव्हती ती आज पहायला मिळत आहे. आत्ताच्या घडीचा संघर्ष हा वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे आहे. प्रसारमाध्यामाच्या मार्फत बातम्यांमधून हा संघर्ष वाढताना आपल्याला पहायला भेटत आहे .याचे उदाहरण बघायचे म्हटले तर, आसपासच्या परिसरातील भागा मधून येणाऱ्या बातम्या वाघाने किंवा बिबट्याने मनुष्यावर केलेला हल्ला, तसेच गव्यांनी शेतात शिरून शेताची केलेली नासधूस. या सर्व उदाहरणात वन्यजीवांचाच दोष आहे असे म्हणतात. पण थोडा विचार केला तर लक्षात येईल, की कुठेतरी आपलाच दोष आहे त्यांचा नाही.
कधी कोणी विचार केला आहे का वन्यजीव मानवी वस्तीत येण्याचे नेमके कारण काय आहे, ते कारण सहज समजन्यासारखे आहे. याचे कारण म्हणजे आपण त्यांच्या अधि- वासात अतिक्रमण केले आहे. आपल्या गरजा वाढत गेल्या नसता तसतशी आपण प्रगती करण्याच्या दृष्टीने त्यांच्या अधिवासात जात आहे. बिबट्याचा विचार केला तर त्याला त्याच्या जीवाची काळजी नाही तो खेड्यामध्ये का शिरेल? खरेतर जंगली प्राणी मानवापासून दोन हात लांबच राहणे पसंत करतात.
आता पहायचे तर संघर्षामध्ये ठरवून प्राणी मारला जात नाही पण आपल्या कुठल्यातरी चुकीच्या कृत्यामुळे त्याचा बळी जातो तसेच रस्त्यांवर गाड्यांखाली येवून किती तरी वन्यजीव मारले जातात. उदा. साप, सरडे, किडे अशाप्रकारे बरेच असतात अजून उदाहरण बघायचे म्हटले तर विजेच्या तारेवर लटकणारी मेलेली वटवाघळे याचे कारण काय तर झाडे तोडून नष्ट करतो कडा कपाऱ्या फोडून वेगवेगळे प्रकल्प करतो. यामध्ये वन्यजीवांचा विचारच केला जात नाही. त्यामुळे वटवाघळासारखे जीव तारांवर आसरा घेतात घ्यायचा प्रयत्न करतात त्यामुळे त्यांना जीव गमवावा लागतो.
शासनाने पर्यावरण वाचवण्यासाठी काही योजना सुरू केल्या आहेत. उदाहरण बघायचे म्हटले तर एक झाड तोडले तर त्याच्या करतू बदल्यात दोन झाडे लावायची. पण ती झाडे खरेच जगवली जातात कार पण ते झाड तोडताना साधा विचार नाहीत की त्याबरोबर किती नुकसान करत आहेत त्या झाडाबरोब वने, बरेच वन्यजीव आणि पूर्ण परिसंस्था जोडलेली असते. या सगळ्याचे गांभीर्य शासनाला होत नाही तोपर्यंत पर्यावरणाच कोणतेही भले होण्याची शक्यता नाही. हा जरी मानव आणि वन्यजीव संघर्षचा भाग असला, तरी परिणामाच्या दृष्टीने जास्त भयानक आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |