काबूल : अफगाणिस्तानमध्ये सत्ता काबीज करण्यासाठी सरसावलेल्या तालिबानने भारताला धमकी दिली आहे. अफगाणिस्तानमध्ये भारतीय लष्कर दाखल झाल्यास त्याचे परिणाम चांगले होणार नसल्याचे तालिबानने म्हटले आहे. लष्करी हस्तक्षेप करण्याआधी भारताने दुसऱ्या देशांची झालेली परिस्थिती पाहावी असेही तालिबानने म्हटले आहे. विशेष म्हणजे अफगाणिस्तानमध्ये भारताने केलेल्या विकास कामांबद्दल तालिबानने कौतुकही केले आहे.
तालिबानचे प्रवक्ते मोहम्मद सुहेल शाहीनने वृत्तसंस्था एएनआयला मुलाखत दिली. शाहीनने म्हटले की, भारत आपल्या सैन्याला अफगाणिस्तानमध्ये पाठवणार असेल आणि भारतीय सैन्य कायम इथेच राहणार असेल तर त्यांच्यासाठी चांगले राहणार नाही. अफगाणिस्तानमध्ये असलेल्या इतर देशांच्या सैनिकांची काय अवस्था झाली हे भारताने पाहिले असेल. शाहीनने पुढे म्हटले की, भारताने अफगाणिस्तानला मदत केली आहे. त्याचे कौतुक केले आहे.
शाहीनने म्हटले की, भारताने अफगाणिस्तानच्या नागरिकांसाठी धरण, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकल्प व इतर विकासकामे केली. अफगाणिस्तानच्या नागरिकांच्या आर्थिक संपन्नतेसाठी केलेल्या कामाचे आम्ही कौतुक करत आहोत. भारतीय शिष्टमंडळासोबत भेट झाली नसल्याचेही शाहीनने स्पष्ट केले. शाहीनने सांगितले की, कोणतीही बैठक झाली नाही. मात्र, दोहातील एका बैठकी दरम्यान भारताचे शिष्टमंडळ उपस्थित होते.
शाहीनने म्हटले की, तालिबानकडून इतर देशांचे दूतावास, राजनयिकांना कोणत्याही प्रकारचा धोका नाही. आम्ही कोणत्याही देशाच्या दूतावासाला अथवा अधिकाऱ्यांना लक्ष्य करत नाही. आम्ही हे वारंवार स्पष्ट केले आहे.
काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानमधील एका गुरुद्वारावरून शीख धर्मियांचा ध्वज निशाण साहिब हटवण्यात आले होते. तालिबानने हे कृत्य केल्याचा आरोप करण्यात येत होता. हे आरोप शाहीनने फेटाळून लावले. शाहीनने म्हटले की, शीख समुदायाने स्वत:हून तो झेंडा काढला होता. जेव्हा तालिबानी सुरक्षा अधिकारी त्या ठिकाणी गेले तेव्हा त्यांनी चौकशी केली. कोणी त्रास देऊ नये यासाठी झेंडा काढण्यात आला होता. तालिबानच्या लोकांनी समजूत काढल्यानंतर निशाण साहिब फडकवण्यात आला.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |