02:19pm | Feb 27, 2021 |
(प्रकाश राजेघाटगे)
पुसेगाव: राज्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या वाढीचा दर असाच कायम राहिल्यास गेल्या अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुरु झालेल्या शिक्षण क्षेत्रासमोर पुन्हा संकट उभे राहिले आहे. रुग्ण वाढीचा आलेख असाच राहिल्यास दोन दिवस आधी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांच्या संभाव्य वेळापत्रकवर संकट उद्भवण्याची भीती राज्य शिक्षण मंडळाच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.
राज्यातील कोरोना संसर्ग प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या शैक्षणिक वर्षातील मार्च, एप्रिल आणि चालू शैक्षणिक वर्षातील जूनपासून नोव्हेंबरपर्यंत राज्यातील पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्याबरोबरच पदवी व पदवीत्तर विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झालेले आहे. राज्यातील टाळेबंदी हळूहळू उठविल्यानंतर आणि कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात दिवाळीच्या अगोदर आणि दिवाळीच्या सुट्टीनंतर राज्यातील नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यास राज्य शासनाने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नियम व अटींना अधीन राहून मान्यता दिली होती.
सध्या पाचवी ते बारावी पर्यंतचे वर्ग आणि पदवी अभ्यासक्रमाचे सुरू झालेले आहेत. परंतु गेल्या 8 ते 10 दिवसांपासून राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या हळूहळू पुन्हा वाढू लागल्याने सर्वत्र भितीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या वाढीचा दर असाच कायम राहिल्यास इयत्ता दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांच्या संभाव्य वेळापत्रकवर संकट उद्भवण्याची भीती राज्य शिक्षण मंडळाच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.
राज्यातील कोरोना रुग्ण वाढत असल्याने पुन्हा परीक्षा पद्धतीमध्ये किंवा वेळापत्रकात बदल झाल्यास कमी मनुष्यबळावर काम करणार्या राज्य शिक्षण मंडळाला ही नियोजनासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच परीक्षा फेब्रुवारी - मार्च ऐवजी एप्रिल - मे या महिन्यात होणार आहेत. बारावीची लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे 2021 या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे या कालावधीत होणार आहे.
मात्र मागील 8 ते 10 दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत रोज वाढ होत आहे. त्यामुळे विदर्भातील अमरावती, अकोला आणि यवतमाळ मध्ये बाधित क्षेत्र जाहीर करण्यात आलेले आहे. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सुरू झालेल्या इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंत शाळा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुन्हा बंद करून ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात आलेले आहेत.
कोरोना रुग्णांच्या वाढीचा आजवरचा आलेख बघता रुग्ण वाढ काही महिने चढती असते. शिक्षण मंडळाच्या परीक्षांना अजूनही दोन महिन्यांचा कालावधी असला तरी कोरोना रुग्णांच्या संख्येत अशी वाढ होत राहिल्यास लेखी परीक्षा घेणे कठीण होणार आहे. मागील वर्षी कोरोना टाळेबंदीमुळे बारावी आणि दहावीच्या परीक्षांच्या निकालास विलंब झाला होता टाळेबंदीमुळे 10 महिन्यापासून शाळा व महाविद्यालये बंद होती. परिणामी 2021 मधील परीक्षा एप्रिल - मे या कालावधीत घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र आता पुन्हा एकदा कोरोना बाधित रुग्ण संख्येमध्ये होत असलेल्या वाढीमुळे चिंता निर्माण झाल्याचे शिक्षण मंडळाच्या सूत्रांनी बोलून दाखवले.
पालकांच्यामध्ये भिती आणि चिंतेचे वातावरण; विद्यार्थी मानसिक तणावात
इयत्ता दहावी आणि बारावी ही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची पुढील दिशा ठरविण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची वर्षे आहेत. मात्र कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने वेळापत्रकात बदल झाल्यास विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नियोजन बिघडणार आहे. शिवाय लेखी परीक्षा ही तीन तासांची असल्याने संक्रमणाच्या भीतीने पालकांच्या मध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर शिक्षण प्रक्रिया ही शाळा शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधील अन्योन्यक्रिया असल्यामुळे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील वातावरणावर याचा विपरीत परिणाम होत असून 16 ते 18 वर्षे वयोगटातील इयत्ता दहावी आणि बारावीचे विद्यार्थी मानसिक ताणतणावात असल्याच्या भावना अनेक पालकांनी व्यक्त केल्या.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |