04:16pm | Jan 22, 2021 |
सातारा: कोरोना संकट काळाने आर्थिक संकटांचा सामना करणार्या वाहन धारकांना आता खासगी वित्तीय संस्था, बँका तसेच फायनान्स कंपन्यांकडून त्रास दिला जात आहे. त्यांच्याकडून केली जाणारी कर्ज वसुली पद्धत अत्यंत चुकीची असून त्यांच्यावर अंकुश ठेवण्यात यावा, अशी विनंती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आरबीआय गव्हर्नर यांना पत्राद्वारे केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, लॉकडाऊन काळ संपताच आता खासगी बँका, वित्तीय संस्थांनी कर्जवसुली मोहिम तीव्र केली आहे. याविरोधात बर्याच वाहनधारकांनी चुकीच्या पध्दतीने सुरू असलेली कर्जवसुली थांबविण्यात यावी, अशी मागणी करत राज ठाकरे यांच्याकडे धाव घेतली होती. दि.22 मार्चपासून कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. यामुळे संपूर्ण बाजारपेठच ठप्प होती. मार्चपूर्वी खासगी वित्तीय संस्था व बँकांमधून अनेकांनी वाहतूक व्यवसायासाठी कर्ज घेतले होते. परंतू लॉकडाऊन काळात जवळपास आठ महिने वाहने उभी असल्याने दैनंदिन गरजा भागवणेही मुश्किल झाले. अशा आर्थिक संकटाचा सामना वाहनधारक करत असतानाही फायनान्स कंपनी व खासगी बँकांनी वाहनधारकांकडून कर्जाचे हप्ते मागण्यास सुरवात केली आहे.
केंद्र शासनाने जाहीर केल्याप्रमाणे काही काळ परतफेडीसाठी सूट मिळाली असली तरी कोरोना संकट काळाने विस्कटलेली आर्थिक घडी सावरायला वेळ लागणार आहे. असे असतानाही कर्ज वसुलीसाठी कर्जदारांवर दबाव आणला जात आहे. कर्जवसुलीसाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब केला जात आहे. याबाबत कर्ज धारकांच्या आर्थिक परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार होणे गरजेचे आहे. यासाठी आरबीआयने चुकीच्या पद्धतीने कर्जवसुली करणार्या वित्तीय संस्था व बँकांवर वचक ठेवावा, अशी विनंती राज ठाकरे यांनी आरबीआय गव्हर्नर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
दरम्यान, कोरोना संकट काळातील टाळेबंदी संपुष्टात येताच अनेक वाहनधारकांनी चुकीच्या पद्धतीने होणार्या कर्ज वसुली बाबत राज ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती. या पार्श्वभूमीवरच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आरबीआय गव्हर्नर यांच्याकडे हे पत्र पाठवले असल्याचे सांगितले जात आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |