06:40pm | Jan 22, 2022 |
पुसेगाव : मागील वर्षी ऐन पेरणीच्या तोंडावर सोयाबीनला चांगला भाव मिळाल्याने शेतकर्यांनी मागील हंगामात सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली. परंतु, अतिवृष्टीने झालेले पिकाचे नुकसान, हवामाणातील बदल व नंतर बाजारात मिळत असलेला कमी भाव यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हे वर्ष आर्थिक नुकसानीचे ठरले. आता मिळत असलेला सहा हजार रुपया भाव पाहून शेतकर्यांना सोयाबीन ठेवायचं, की विकायचं असा प्रश्न पडला आहे.
एकीकडे , आस्मानी आणि सुलतानी संकटामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी जेरीस आलेला असताना जवळपास एक महिना उलटला पण सोयाबीनचे दर कमीही होत नाही आणि वाढतही नाहीत. दरात स्थिरता कायम असून सोयाबीनला सध्या पाच हजार सातशे ते सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. या दरात महिनाभरापासुन स्थिरता बघायला मिळत आहे. मध्यंतरी किंचीत चढ-उतार पाहावयास मिळाला. परंतु, चढ-उतार नोंद घेण्याजोगे नव्हते. सोयाबीन पिकाची पेरणी ही दरवर्षी पेक्षा यावर्षी जास्त प्रमाणात होती. त्यामुळे सोयाबीन पिकाचे उत्पादन वाढप्याचे मानले जात होते. परंतु प्रत्यक्षात सोयाबीनचा उतारा आला नाही. सोयाबीन पिकाला यावर्षीच्या हंगामा सुरुवाती पासूनच पाच हजार रुपये क्विंटल पेक्षा जास्त बाजार भाव मिळाला. तेव्हा मागणी जास्त आणि पुरवठा कमी, असे चित्र होते. पण आता जवळपास एक महिना उलटला पण सोयाबीनचे दर कमीही होत नाहीत आणि वाढतही नाहीत.
राज्यात सर्वत्र अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक ठिकाणी सोयाबीन पिकावरून पाणी फिरले होते. त्यामुळे अनेक भागात सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले. पिकाच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या काही आठवड्यात सोयाबीन दरात वाढ होऊ शकते, असे व्यापाऱ्यांकडून संकेत मिळत आहेत. पिकाचे सध्याला पाच हजार सातशे ते सहा हजार तिनशे रुपये प्रति क्विंटल दर मिळत असून, या दरात. स्थिरता बघायला मिळत आहे.
घेवड्याचे दर वाढले पण सोयाबीनचे नाही
सध्या बाजारात सोयाबीनला सहा हजार ते सहा तीनशे रुपये भाव मिळत आहे. मागील काही दिवसांपासून सोयाबीनचे दर कमी झाल्यामुळे शेतकर्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. लागवडीसाठी केलेला खर्चही निघाला नाही. २०२१ मध्ये ऑगष्ट, सप्टेंबरमध्ये सोयाबीनला ८ ते ९ हजार भाव होता. त्यापूर्वी सोयाबीनला मात्र ११ हजार ते १२ हजार रुपये भाव मिळाला होता. ते पाहून मागील हंगामात शेतकर्यानी सर्वाधिक सोयाबीनची पेरणी केली. परंतु, शेतकऱ्यांच्या मागे संकटांची मालिका सुरू झाली. सध्या घेवड्याचे भाव वाढले असून शेतकर्यांकडे मात्र घेवडाच नाही. सध्या व्यापान्यांकडे घेवडा असल्याने ९ हजारावर गेला आहे. हे पाहून सोयाबीन विकावे की ठेवावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |