04:51pm | Feb 03, 2021 |
कोलंबो: चीनला शह देण्यासाठी महत्वाचा असलेला प्रकल्प श्रीलंका सरकारने रद्द केला. देशांतर्गत वाढत चाललेला विरोध याला कारणीभूत ठरला असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतू यामुळे भारताला मोठा धक्का बसला आहे.
हिंदी महासागरात चीनला शह देण्यासाठी भारतासाठी हा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा होता. मात्र, देशातंर्गत सुरू असलेल्या विरोधामुळे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी हा प्रकल्प रद्द केला आहे. रणनीतिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असणारा इस्टर्न कंटेनर टर्मिनल प्रकल्प श्रीलंकेच्या सरकारने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
इस्टर्न कंटनेर टर्मिनल प्रकल्प श्रीलंका, भारत आणि जपान संयुक्तपणे राबवणार होते. सिरीसेना यांच्या सरकारने या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. ईसीटी प्रकल्प हा 50 कोटी अमेरिकन डॉलरचा असून कोलंबो इंटरनॅशनल कंटेनर टर्मिनलजवळ आहे. या प्रकल्पाच्या सामंजस्य करारावर दोन वर्षापूर्वीच स्वाक्षर्या करण्यात आल्या होत्या. या करारानुसार भारत आणि जपानकडे या बंदराची 49 टक्के आणि श्रीलंका बंदर प्राधिकरणाकडे 51 टक्के भागिदारी राहणार होती. आता श्रीलंकेने हा प्रकल्प रद्द केला असून भारत आणि जपानसोबत वेस्टर्न कंटेनर टर्मिनल उभारणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
भारत आणि जपानसोबतच्या या कराराला बंदर कामगार संघटनांनी विरोध केला होता. जवळपास 23 कामगार संघटना या कराराविरोधात होत्या. या एउढ प्रकल्पावर पूर्णपणे श्रीलंका बंदर प्राधिकरणाचा अधिकार असावा अशी मागणी करण्यात आली होती. भारताच्या अदानी समूहासोबत करण्यात आलेला हा करार योग्य नसल्याचा आक्षेप कामगार संघटनांनी केला. कराराला विरोध करणार्या बहुतांशी संघटना या सत्तारुढ पक्षाशी संबंधित आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |