02:51pm | Jan 03, 2021 |
नवी दिल्ली : केंद्राचे तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनास शनिवारी 38 दिवस पूर्ण झाले. दरम्यान, गाझीपूर सीमेवर कश्मीरसिंग नावाच्या शेतकर्याने आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. त्यांनी सुसाइड नोटमध्ये लिहिले की, अखेर कुठपर्यंत आपण येथे थंडीत बसून राहणार, सरकार ऐकत नसल्याने जीव देत आहे, म्हणजे तोडगा निघेल. गाझीपूर सीमेवरच अंत्यसंस्कार करण्याचीही इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
75 वर्षांचे कश्मीरसिंग सुरुवातीपासून मुलगा व नातवासोबत दिल्लीतील शेतकरी आंदोलनात सहभागी होते. त्रस्त होऊन शनिवारी त्यांनी आंदोलनस्थळी असलेल्या शौचालयात जाऊन फाशी घेतली. याआधी शुक्रवारी उत्तर प्रदेशच्या सीमेवर 55 वर्षांचे शेतकरी गलतानसिंग यांचा थंडीमुळे मृत्यू झाला होता. या आंदोलनात आतापर्यंत आत्महत्या व इतर कारणांनी 40 शेतकर्यांचा मृत्यू झाला आहे. शेतकर्यांच्या वाढत्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर भारतीय किसान युनियनचे (बीकेयू-टिकेत) प्रदेशाध्यक्ष बिजेंद्र यादव यांनी कोणत्याही स्थितीत आंदोलक शेतकर्यांच्या मागण्या सरकारकडून मान्य केल्या जाव्यात, अशी मागणी केली, तर केंद्राने कायदे रद्द केले नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा संयुक्त किसान मोर्चाने दिला.
कुंडली आणि टिकरी सीमेवरून 6 जानेवारीला ट्रॅक्टर मार्च काढला जाईल. 15 जानेवारीपर्यंत भाजप नेत्यांना घेराव घालण्यात येईल. नंतर 23 जानेवारीला राजभवनपर्यंत मार्च काढला जाईल. 26 जानेवारीला दिल्लीत शेतकरी प्रजासत्ताक परेड काढण्याची घोषणा संयुक्त किसान मोर्चाने केली आहे. दरम्यान,शेतकरी कुटुंबातील किमान एकाने सहभागी व्हावे, असे आवाहन स्वराज इंडियाचे योगेंद्र यादव यांनी केले.
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |