01:49am | May 25, 2020 |
सातारा: ऐन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परजिल्ह्यातील कामगारांना खंडाळा तालुक्यात बेकायदेशीर आणून ठेवण्याचे पाप खंडाळा तहसिलदार व शिरवळ पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांनी केले आहे. खंडाळा तालुक्यातील औद्योगिक कंपन्यांचे तसेच लेबर ठेकेदारांच्या हातातील बाहुले झालेल्या व पुण्यातील कामगारांना बेकायदेशीरपणे जिल्ह्यात प्रवेश दिल्याबद्दल खंडाळ्याच्या तहसिलदारांसह शिरवळच्या ठाणेदाराची तत्काळ चौकशी करुन त्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यासह, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात असे म्हणण्यात आले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून खंडाळा तालुक्यात औद्योगिकीकरणाचे वारे वाहत आहे. त्यामुळे अनेक छोट्या-मोठ्या कंपन्या शिरवळ-खंडाळा परिसरात कार्यरत आहेत. असे असताना याठिकाणी स्थानिक भूमिपूत्रांसह परप्रांतीय कामगारही या कंपन्यांमध्ये काम करीत असतात. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये याठिकाणी अनेक गुंडापुंडांनी आपले बस्तान बसवत कंपन्यांमध्ये लेबर ठेकेदारीचे काम सुरु केले आहे. त्यामुळे याठिकाणी लेबर ठेकेदारांच्या माध्यमातून गुंडगिरी, गुंडगिरीच्या माध्यमातून पैसा व पैशाच्या माध्यमातून राजकारण असे उद्योग खंडाळा तालुक्यात सुरु आहेत. गेली दोन महिने कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील जनजीवन ठप्प झाले आहे. असे असताना सातारा जिल्हाधिकार्यांनी गेल्याच आठवड्यात जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांना उपलब्ध 33 टक्के मनुष्यबळाच्या आधारे काम सुरु करण्यास सशर्त परवानगी दिली होती. लॉक डाऊनमुळे अनेक परप्रांतीय कामगार यापूर्वीच आपापल्या राज्यात गेले आहेत. असे असताना जिल्ह्यातील भूमिपूत्रांना शिरवळ-खंडाळा परिसरातील कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध असतानाही लेबर माफिया बंड्या-खंड्याने खंडाळा तहसिलदार दशरथ काळे आणि शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश हजारे यांना हाताशी धरुन पुणे जिल्ह्यातून येथील एशियन पेंटस कंपनीमध्ये काम करण्यासाठी सुमारे 21 कामगार गेल्या आठवड्यात आणले होते. याची कुणकुण स्थानिकांना लागल्यानंतर स्थानिकांनी ग्राम समितीच्या माध्यमातून कामगारांना ठेवण्यात आलेल्या राजावत या हॉटेलमध्ये जावून परजिल्ह्यातील कामगारांचा पर्दाफाश केला होता. त्यामुळे नाईलाजाने पोलिसांनी 21 पैकी फक्त 15 कामगारांवर कारवाई करीत त्यांची रवानगी संस्थात्मक विलगीकरणात केली होती. सध्या ते कामगार संस्थात्मक विलगीकरणात असले तरी नक्की ते तेच आहेत काय? याचीही खात्री जिल्हाधिकार्यांनी करायला हवी. तसेच इतर सहा कामगार नक्की गेले कुठे, याचाही शोध जिल्हा प्रशासनाने घ्यायला हवा. वास्तविक परजिल्ह्यातील व्यक्तीला जिल्ह्यात येण्यासाठी मोठे दिव्य पार करावे लागते. शासनाने दिलेला प्रवास पास असेल तरच त्याला सातारा जिल्ह्यात एन्ट्री दिली जाते. असे असताना पुणे जिल्ह्यातून ते 21 कामगार सातारा जिल्ह्यात आलेच कसे? ते आभाळातून पडले की जमिनीतून प्रकट झाले, याचा शोधही सातारा जिल्हाधिकार्यांनी घ्यावा, अशी मागणीही ओव्हाळ यांनी केली आहे. खंडाळा तालुक्यात सातारा जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर उभ्या करण्यात आलेल्या चेक पोस्टवर मोठा गैरव्यवहार सुरु आहे. परजिल्ह्यातील अनेकांना आर्थिक तडजोडी करुन सातारा जिल्ह्यात विनासायास प्रवेश दिला जातो. स्वत: खंडाळा तहसिलदार हे आपल्या मर्जीतील कंपनी अधिकार्यांच्या सांगण्यानुसार या चेक पोस्टवरुन शेकडो कामगार व अधिकार्यांना ये-जा करण्यास मुभा देत आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्याला कोरोना संसर्गाचा मोठा धोका निर्माण झालेला आहे. खंडाळा तहसिलदारांची बेफिकीरी सातारा जिल्ह्याला खड्ड्यात घालणार आहे. शिंदेवाडी चेक पोस्टवर शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश हजारे यांचा अंमल चालतो. हजारेंच्या परवानगीशिवाय जिल्ह्याच्या हद्दीत मुंगीही प्रवेश करु शकत नाही. असे असताना ते 21 कामगार जिल्ह्यात आलेच कसे? त्यामुळे उंदराला मांजर साक्षी या प्रमाणे हजारे व काळेंची मिलीभगत असल्यानेच हे शक्य झाले आहे. मध्यंतरी जिल्ह्यात दीड महिने अनुज्ञप्ती अर्थात दारुविक्रीची दुकाने बंद होती. असे असताना या चेक पोस्टमधून रिक्षांच्या माध्यमातून लाखो रुपयांच्या दारुची तस्करी सातारा जिल्ह्यात झाली. ही तस्करी कोणाच्या आशिर्वादाने झाली? करणारा एक, तर गुन्हा दाखल दुसर्यावरच अशा पद्धतीने शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश हजारेंनी भानगडी केल्या आहेत. तसेच सुमारे सहा महिन्यांपूर्वी अहिरे, ता. खंडाळा हद्दीत असणार्या प्रिमीयम चिक फिडस् प्रा. लि. या कंपनीमध्ये एका कामगाराचा ऑन ड्यूटी अपघाती मृत्यू झाला होता. हे प्रकरणही त्यावेळी राजकीय दबावाखाली दाबण्यात आले होते. अद्याप त्या मृताच्या कुटूंबियांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे खंडाळा तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या काही भानगडी सुरु आहेत, त्या भानगडीत खंडाळा तहसिलदारांसह शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश हजारेही सहभागी आहेत. त्यामुळे या दोघांची उच्चस्तरीय चौकशी करुन त्यांना तत्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणीही दादासाहेब ओव्हाळ यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
#digitalexclusive
— Satara Today (@SataraToday) May 24, 2020
खंडाळा तहसिलदारांसह शिरवळच्या ठाणेदाराला बडतर्फ करा pic.twitter.com/emPAH6aYj4
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |