04:48pm | May 28, 2020 |
नवी दिल्ली : पाकिस्तानातून आलेल्या टोळधाडीचे महाराष्ट्रावर आक्रमण सुरू झाले आहे. या टोळधाडीने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. या आक्रमणामुळे बळीराजा अडचणीत सापडला आहे. पाकिस्तानातून आलेली टोळधाड आता महाराष्ट्रासह नऊ राज्यांपर्यंत पोहोचली आहे.
मान्सूनच्या आधी टोळधाडीला संपविण्यात आले नाही तर खरीप पिकांचे नुकसान होऊ शकते, असेही एलडब्ल्यूओने आपल्या अहवालात नमूद केले आहे. गेल्या काही दिवसात महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यात 303 ठिकाणी 47 हजार 308 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान टोळधाडीने केलेले आहे. टोळधाडीचा मुकाबला करण्यासाठी विविध राज्य सरकारांनी आपापल्या स्तरावर प्रयत्न सुरू केले आहेत.
महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, तामिळनाडू आणि प. बंगाल यांचा समावेश आहे. टोळधाडीचा हल्ला परतवून लावण्यासाठी शेतकरी आणि स्थानिक प्रशासन विविध उपाय योजत आहेत. आगामी महिन्यात टोळधाडीमुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा केंद्र सरकारच्या अखत्यारितील एलडब्ल्यूओ संस्थेने दिला आहे.
उत्तर प्रदेशातील ललितपुर, मथुरा आणि कानपुर ग्रामीण भागातील शेतकर्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. राजस्थानमध्ये परिस्थिती जास्त खराब आहे. जयपूरमध्ये कृषी विभागाने ठिकठिकाणी कीटनाशकांची फवारणी केली आहे. फवारणीसाठी ड्रोनची मदत घेतली जात आहे. अग्निशमन दलाच्या गाड्यांद्वारे देखील कीटकनाशके फवारली जाणार आहेत. टोळधाड नियंत्रणासाठी 120 सर्वेक्षण वाहन व 810 ट्रॅक्टर्सची मदत घेतली जात आहे.
छत्तीसगडमध्ये लाखोंच्या संख्येने कीटक येऊ शकतात, असा इशारा देण्यात आला आहे. शेतकर्यांना टोळधाड नियंत्रणाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले जात आहे. टोळधाडीने महाराष्ट्रातील नागपूर विभागातही प्रवेश केला आहे. टोळधाड रामटेक शहराकडे जाण्याचा अंदाज आहे. फेत्री, खानगाव येथील शेतांचे नुकसान केल्यानंतर टोळधाडीने वर्धा जिल्ह्यातील संत्री पिकांबरोबरच भाजीपाल्याचे नुकसान केले होते.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |