03:58pm | May 25, 2020 |
नवी दिल्ली: “देशातील वातावरण आणि मूड बदलण्यासाठी क्रीडा स्पर्धा होणं अत्यंत महत्त्वाचे आहे. आयपीएल सुरू झाल्यास, त्याचा मोठा परिणाम दिसून येईल,” असं धवन म्हणाला. श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू अँजेलो मॅथ्यू याच्याशी चर्चा करताना तो बोलत होता. त्यानं पुढे सांगितले की,”प्रत्येकाच्या सुरक्षेची योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. आयपीएल झाल्यास ते आमच्यासाठी आनंदाची गोष्ट असेल. शिवाय त्यामाध्यमातून जगभरातील लोकांमध्ये सकारात्मकताही पसरण्यास मदत होईल.”
कोरोना व्हायरसच्या संकटात जगभरातील अनेक क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. इंडियन प्रीमिअर लीगवर (आयपीएल) अजूनही अनिश्चिततेचं सावट आहे. देशातील सद्यस्थिती पाहता, आता तरी ती खेळवली जाईल, याची शक्यता फार कमी आहे. पण, आयपीएल खेळवायला हवी, असं मत भारताचा सलामीवीर शिखर धवननं व्यक्त केलं आहे आणि त्यामागे त्यानं एक लॉजिकही सांगितलं आहे.
जगभरातील कोरोना रुग्णांचा आकडा 55 लाखांच्या वर गेला आहे. त्यापैकी 23 लाख रुग्ण बरे झाले आहेत, परंतु जवळपास साडेतीन लाख रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. देशातील कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 38, 917 इतकी झाली आहे. त्यापैकी 57,721 रुग्ण बरे झाले आहेत, तर 4 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना व्हायरसच्या संकटात आयपीएलच्या माध्यमातून समाजात सकारात्मकता पसरवण्यात मदत होईल आणि लोकांचं मनही प्रसन्न राहिल, असं मत धवननं व्यक्त केलं. त्यामुळे यंदा आयपीएल होईल अशी आशा त्याला आहे. 29 मार्च ते 24 मे या कालावधीत आयपीएल होणं अपेक्षित होतं, परंतु कोरोनामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ( बीसीसीआय) पुढील सुचनेपर्यंत लीग स्थगित करावी लागली आहे.
ट्वेंटी-20 वर्ल्ड कपच्या जागी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयपीएल खेळवण्यात येईल अशी चर्चा आहे. ”आयपीएल होईल, अशी आशा व्यक्त करतो. मी नेहमी सकारात्मक दृष्टीकोनातून विचार करतो. त्यामुळे आयपीएल झाल्यास ते सर्वांसाठी चांगलं असेल. आयपीएल प्रेक्षकांविना झाल्यास, आम्ही ते दिवस मिस करू. चाहत्यांसमोर खेळण्याची मजा काही निराळीच असते.”
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |