09:46pm | Nov 24, 2022 |
सातारा : कर्नाटक शासनाने बेळगाव सीमा प्रश्नाच्या संदर्भात वाद न्यायप्रविष्ट असताना 2014 मध्ये या खटल्याचा निवाडा करण्याचा सुप्रीम कोर्टाला अधिकारच नाही, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या खटल्याचा जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत 2004 मध्ये महाराष्ट्राने दाखल केलेल्या मूळ सीमा प्रश्नातील दाव्याला बळकटी येणार नाही. त्याकरता महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात नामवंत वकिलांची फौज उभी करून पूर्ण ताकतीने हा खटला लढला पाहिजे. केंद्रात, महाराष्ट्रात आणि कर्नाटकात तिन्ही ठिकाणी भाजपचेच सरकार असल्याने या प्रकरणात केंद्राने मध्यस्थी करावी याकरिता महाराष्ट्राचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटायला हवे, अशा चाणाक्ष रणनीतीचे प्रतिपादन कराड उत्तरचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केले.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, सचिव नरेंद्र देसाई इत्यादी उपस्थित होते.
पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले, बेळगाव, बिदर, भालकी, निपाणी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, असा सीमा भागातील 864 गावांचा टाहो गेल्या 66 वर्षापासून सुरू आहे. आता कर्नाटक सरकारने सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील चाळीस गावा संदर्भात जे विधान केले आहे ते गैरलागू आहे. आज तालुक्यातील चाळीस गावे मागितली, उद्या मुंबईवर दावा सांगतील. सीमा प्रश्नाचे गांभीर्य मोठे असून कोणीही कोणत्याही स्वरूपात असा दावा सांगू शकत नाही. तेथील विकासाचे प्रश्न तत्कालीन सरकारने नेहमीच सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2004 साली महाराष्ट्र सरकारने महाजन आयोगाला आक्षेप घेणारा अंतरिम दावा सुप्रीम कोर्टात दाखल केला होता. त्याची सुनावणी सुरू असताना कर्नाटक सरकारने 2014 मध्ये या दाव्याला आव्हान देणारा दुसरा नवीन दावा सुप्रीम कोर्टात दाखल करून हा खटला चालवण्याचा सुप्रीम कोर्टाला अधिकारच नाही, अशी याचिका दाखल केली. त्यामुळे मूळ खटल्याला अडचण झाली आहे. यामधून मार्ग काढण्यासाठी केंद्र शासनाकडे महाराष्ट्राने शिष्टमंडळ पाठवून या प्रकरणात केंद्रानेच कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमाप्रश्नात मध्यस्थी करावी हे संयुक्तिक आहे. कारण येथे दोन्ही राज्यांमध्ये भाजपचेच सरकार आहे. सुप्रीम कोर्टात लढाई लढण्यासाठी अत्यंत निष्णात वकील देणे गरजेचे आहे. सीमा प्रश्नांचा लढा अत्यंत ताकतीने लढणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी नुकतीच सीमा प्रश्नाच्या संदर्भात बैठक घेऊन तेरा सदस्यांची यासंदर्भामध्ये समिती स्थापन केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, आमदार चंद्रकांत दादा पाटील असे अनेक दिग्गज व विरोधी पक्षनेते अजित दादा पवार यांचा या समितीमध्ये समावेश आहे. सीमा प्रश्नाच्या संदर्भात महाराष्ट्र सरकार अत्यंत संवेदनशील असून अल्पसंख्यांक भाषिक आयोगाच्या माध्यमातून सीमा भागातील नागरिकांना नोकरीमध्ये आरक्षण देणे तसेच त्यांना विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देणे, महाराष्ट्रामध्ये त्यांच्या संदर्भात काही सवलती लागू करणे इत्यादी सवलती लागू केल्या जाऊ शकतात आणि याकरिता हा आयोग अत्यंत दक्ष असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या छत्रपती शिवरायांच्या संदर्भातील आक्षेपार्ह व्यक्तव्यवर पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथील पत्रकार परिषदेत अक्षरशः हात जोडले होते. त्यांच्या या व्यक्त होण्यावर त्यांना छेडले असता ते म्हणाले, अशा पद्धतीची वक्तव्य करणे हे अत्यंत चुकीचे आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भामध्ये माफीनामा दिला आहे काय, किंवा राज्यपालांना परत पाठवले जावे असे लेखी दिले आहे काय तर अद्याप ते दिलेले नाही. त्यामुळे त्यांची भूमिका या संदर्भातील स्पष्ट होत नाही. या प्रकरणाचा राज्य सरकारने थेट निषेध करावा, अशी मागणी त्यांनी केली. काँग्रेस पक्ष अध्यक्षपदाच्या निवडणुकी संदर्भात थरूर यांनी लोकशाही निवडणुकीच्या माध्यमातून निवडणूक लढवली. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. काँग्रेसने आजही काही निवडणुकीचे संकेत बाळगले आहेत. राज्यातील ओला दुष्काळ तसेच शेतकऱ्यांची रखडलेली प्रलंबित मदत जिल्ह्यातील 173 शाळा पट नसल्याने बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. या संदर्भात राज्य शासनाला वेळीच जाग आणणे गरजेचे आहे. अशा विविध प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांकडे आम्ही दाद मागणार असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
राहुल गांधी यांची पदयात्रा नांदेड येथे असणार आहे. प्रत्येक जिल्हा एक दिवस त्यानुसार राजकीय हालचाली सुरू आहेत. नांदेड व शेगाव अशा दोन ठिकाणी सभा होणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये फलक लावणे, रॅली काढणे, वातावरण निर्मिती करणे इत्यादी कार्यक्रम घेतले जात असून वेगवेगळ्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये पदयात्रा काढण्याचे काम काँग्रेसच्या माध्यमातून सुरू आहे. यात्रेचा हा कार्यक्रम न भूतो न भविष्यती असा आहे. राहुल गांधी यांची ही यात्रा संपल्यानंतर गुजरात ते आसाम अशी पूर्व पश्चिम यात्रा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. यामध्ये काँग्रेसने संपूर्ण भारतात वेगळी वातावरण निर्मिती करून 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करण्याचे उद्दिष्ट निश्चित केलेले आहे. यात्रेचा हा मार्ग संपूर्णपणे निश्चित असून अनेकांनी जरी मागणी केली तरी त्यात बदल होऊ शकणार नाही. काँग्रेस मधून बाहेर गेलेल्या अनेक दिग्गजांना काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणी प्रक्रियेमध्ये पुन्हा सामावून घेतले जाईल आणि त्याकरता जोरदार प्रयत्न केले जातील, अशी स्पष्ट ग्वाही पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |