सातारा : पश्चिम महाराष्ट्रात काही भागात वादळी वार्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने झालेली गारपीट शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करून गेली. हवामान खात्याने काही दिवसांपूर्वीच याबाबतची शक्यता वर्तवली होती. बुधवारी दुपारनंतर कोरेगाव तालुक्यातील उत्तर भागात व माण खटावमधील मोळ व डिस्कळ परिसरात प्रचंड गारपीट झाल्यामुळे विविध पिकांचे लाखो नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. राज्यात लागलेला मिनी लॉकडाऊन, कोरोना आणि आता गारपीट झाल्याने शेतकरी पुरता कोलमडून गेला आहे.
कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रक, वाठार स्टेशन, अनपटवाडी, सोनके या गावांमध्ये पावसाच्या जोरदार सरी व गारांचा पाऊस झाला. या पावसामुळे या भागात असणारे कांदा, ऊस आणि कलिंगड या पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. उभ्या पिकात गारांचा खच पडल्याने पिके भिजून कुजण्याची दाट शक्यता आहे, तर उस कोलमडून पडला आहे. कांद्याच्या मुळांवर परिणाम झाल्याने कांद्याचेही मोठे नुकसान झाले आहे. या भागात सुमारे दोन तास गारपीट सुरू होती. घरांच्या छतावरच गारांचा खच साचल्याने अनेकांचे छप्पर गळत होते.
खटाव तालुक्याच्या उत्तर भागालाही गारपीटीने झोडपून काढले. तसेच वडूज कातरखटाव परिसरातही गारा पडल्या. येथे कांद्यासह फळबागांचे लाखोंचे नुकसान झाले. मोळ, डिस्कळ, मांजरवाडी, पसुचा मळा परिसरात गारांचा तुफान पाऊस पडला. यंदाच्या रब्बी हंगामातील या परिसरातील हा तिसरा गारांचा पाऊस आहे. गारपिटीने कांदा पिकाचे आणि ज्वारीच्या कडब्याचे मोठे नुकसान झाले आहे. आंबा, चिक्कू, पपई आणि शेवग्याच्या बागांचेही आतोनात नुकसानझाले आहे. वडूजमध्येही गारांचा पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली. कातरखटाव, येरळवाडी परिसरातही गारांच्या पावसाने शेतीचे नुकसान झाले. रस्त्यावर, शेतांमध्ये, घरांच्या अंगणात सर्वत्र गारांचा खच साचला होता.
यासह कोरेगावच्या अन्य भागात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. वाई तालुक्यातील बहुतांश परिसरात सरी कोसळल्या. रब्बी हंगाम ऐन काढणीत असताना आलेल्या या पावसामुळे शेतकर्यांची पिके पाण्यात गेली आहेत. यामुळे हातचे पिक वाया गेल्याने शेतकरी आर्थिक गर्तेत अडकला आहे. त्यामुळे या गारपीटीचा तत्काळ पंचनामा करून मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.
सध्या शेतात काढणीला आलेल्या पिकांची काढणी चालू होती. कांदा बियाणे खुडण्याची कामे सुरू होती. अनेक शेतकर्यांचे कलिंगड पिक ही अंतिम टप्प्यात आले आहे. त्याचे मोठे नुकसान झाले आहे. काढणी केलेले कांदा बियाणे झाकून ठेवताना शेतकर्यांची मोठी धांदल उडाली. तर शेतात उभी असलेली पिकं अक्षरशः गारा खाली झाकून गेली. शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
एका बाजूला कोरोना दुसर्या बाजूला निसर्ग अशी अवस्था शेतकर्यांची झाली आहे.कोरोनामुळे अर्थचक्राची गती मंदावली आहे. शेतमालाला दर मिळत नाहीत.त्यामुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकर्यांच्या नशिबी अवकाळी पाऊस आला आहे.त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे होत्याचे नव्हते झाले आहे. त्यामुळे या गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्वरीत मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |