03:15pm | Apr 28, 2020 |
सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी जाहीर केल्यानंतर तब्बल गेले २७ दिवस साताऱ्यामध्ये एकही आंदोलन न झाल्यामुळे क्रांतिकारकांच्या जिल्ह्यात आंदोलनाला ब्रेक लागण्याची जिल्ह्याच्या इतिहासातील ही पहिलीच घटना मानली जाते. मोर्चा, धरणे आंदोलन, निदर्शने, बेमुदत उपोषण, आत्मदहन यापैकी एकही आंदोलन न झाल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराने पहिल्यांदाच नि:श्वास सोडला आहे.
क्रांतिसिंह नाना पाटील यांची जन्मभूमी म्हणून देशभरात सातारा जिल्ह्याची ओळख आहे. याच जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिकांनी अनेक लढायांमध्ये पुढे घेऊन त्या यशस्वी करून दाखवल्या होत्या. जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्यसैनिकांचे संख्या फार मोठ्या प्रमाणावर आहे. पश्चिम महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यामध्ये विविध सामाजिक संस्था व संघटनांचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर असल्याचे मानले जाते. जिल्ह्यात धरणग्रस्तांचे प्रश्न गेले अनेक वर्ष प्रलंबित असल्यामुळे श्रमिक मुक्ती दलाच्या रुपाने धरणग्रस्तांसाठी काम करणारी एक मोठी संघटना जिल्ह्यात कार्यरत आहे. श्रमिक मुक्ती दल, विद्रोही चळवळ, अंगणवाडी सेविका, विविध पुरोगामी संघटना, कर्मचारी संघटना, आदी संघटनांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर आहे. शासनाकडे निवेदने देऊनही ज्या मागण्या मान्य होत नाहीत अथवा सातत्याने प्रलंबित राहतात, अशा मागण्या मान्य होण्यासाठी बहुतांशी विविध संघटना मोर्चे, धरणे आंदोलने, निदर्शने या सारख्या आंदोलनांचा मार्ग स्वीकारतात. ही आंदोलने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ केली जातात. प्रवेशद्वाराजवळ असणाऱ्या फुटपाथवर अनेक संघटनांनी महिनों महिने धरणे आंदोलन केल्याचा इतिहास आहे. गतवर्षी धरणग्रस्तांच्या प्रश्नासाठी श्रमिक मुक्ती दलाने केलेले आंदोलन जिल्ह्याच्या इतिहासात नोंद घेण्यासारखे ठरले होते. दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ याठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आले होते. अंगणवाडी सेविका, सिटू संघटना यासारख्या संघटनांच्या माध्यमातून विविध प्रश्नावर सातत्याने आंदोलन केली जातात हे नेहमीच सातारकरांना पाहायला मिळते. व्यक्तिगत पातळीवर याचे प्रश्न सुटत नाहीत ते आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आत्मदहन आंदोलन करण्याचाही कचरत नाहीत, या गोष्टी सुद्धा सातारा जिल्ह्याला परिचित आहेत.
सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्च रोजी संचारबंदी जाहीर करण्यात आली. १४४ कलम लागू करण्यात आल्यामुळे पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली. या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आल्यामुळे २२ मार्चपासून सातारासह जिल्ह्याच्या अन्य भागात कोठेही मोर्चा, निदर्शने, धरणे आंदोलन, बेमुदत उपोषण यासारखे कोणतेही आंदोलन झाले नाही. कोरोनामुळे क्रांतीकारांचा जिल्ह्यात आंदोलनाला ब्रेक लागण्याची ही पहिलीच वेळ असून सातारा जिल्ह्याची निर्मिती झाल्यापासून साताऱ्यात येथे आंदोलन न झाल्याची इतिहासातील बहुदा ही पहिलीच वेळ असावी असे सांगितले जात आहे.
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |