01:42pm | Jul 04, 2022 |
नवी दिल्ली : कोणताही गट शिवसेना पक्ष ताब्यात घेऊ शकत नाही. अशाप्रकारे पक्ष ताब्यात घ्यायला शिवसेना म्हणजे युक्रेन आहे का? खऱ्या आणि खोट्या शिवसेनेचा प्रश्नच येत नाही. जिथे ठाकरे तिथेच शिवसेना असेल, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले आहे. विधिमंडळात शिवसेना दुबळी झाली आहे, ही बाब आम्ही मान्य करतो. पण महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागात आजही तीच शिवसेना आहे. काही लोक पक्ष सोडून गेले म्हणून शिवसेना संपली, असे म्हणणे बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे. बाळासाहेब ठाकरेंचा अपमान महाराष्ट्रातील जनता कदापि खपवून घेणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले. ते सोमवारी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली. काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली. त्यांनी शिवसेना का सोडली, हा प्रश्न त्यांनाही पडला असेल. त्यांनी हा निर्णय कोणत्या परिस्थितीत घेतला ते माहिती नाही. मात्र, काल सभागृहात 'ईडी, ईडी'चा गजर पाहता, यामागील कारणाची कल्पना येते, असे संजय राऊत यांनी म्हटले.
महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता : राऊत
शिवसेना नेते संजय राऊत यांनीही महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता वर्तविली आहे. मी शरद पवारांच्या वक्तव्याशी सहमत आहे. माझ्या माहितीप्रमाणे, भाजपच्या नेत्यांनी ही केलेली तात्पुरती व्यवस्था आहे. भाजपला शिवसेना फोडायची होती आणि त्यांनी ती फोडून दाखवत फुटीर गटाच्या नेत्याला मुख्यमंत्रिपद दिलं. त्यामुळे मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता आहे' असे संजय राऊत यांनी म्हटले. मुंबई आणि महाराष्ट्रात जोपर्यंत शिवसेना मजबुतीने उभी आहे, तोपर्यंत महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा डाव यशस्वी होणार नाही, हे भाजप नेत्यांना माहीत आहे. त्यामुळे शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न आहे. मात्र शिवसेना कागदावर कमजोर दिसत आहे, रस्त्यावर नाही. शिवसैनिक रस्त्यावर उतरेल, असेही संजय राऊत यांनी म्हटले.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |