12:26pm | Dec 22, 2020 |
(प्रकाश राजेघाटगे)
बुध: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात पोटापाण्याच्या सोयीसाठी बाहेर गावी गेलेले नागरिक कुटुंबीयांच्या सुरक्षिततेच्या काळजीच्या इराद्याने आपल्या गावाची वाट धरली खरी परंतु गावातील नागरिकांनी गावच्या वेशी व रस्ते आडवल्याचा कटू अनुभवास सामोरे जावे लागले. गावकर्यांसमोर गावातील प्रवेशाकरिता हातपाय पसरून देखील त्यांच्या याचनेची कोणी दखल घ्यायला तयार नव्हते. इतकेच काय पोलिसांना पाचारण करण्याची धमकी वजा भाषेचा वापर करण्यात आला. कोरोनापासून जीव वाचवण्यासाठी आपल्या गावात मोठया अपेक्षेने परतणार्या नागरिकांना मात्र गावबंदी करण्यात आली होती.
आपला गाव त्यांना परका झाल्यासारखा होता. आता याच हाकलून देणार्या नागरिकांची आठवण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने येत असल्याने एकेक मतांना किती महत्व प्राप्त होत आहे. याची प्रचिती येतांना दिसत आहे. वॉर्डात उभे राहून आपले नशीब आजवणारे उमेदवार सध्या निवडणूकीपूर्वीच एकेक मतांची जुळवाजुळव करण्याची बेरीज गावपुढारांकडून आखण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुक निमित्ताने बाहेरगावी गेलेल्या मतदारांना व त्यांच्या मतांना महत्व आले आहे. यासाठी कोण कुठे राहायला गेलेले आहे?, किती जणांचे मतदान आपणास पडतील? याचे नियोजन करण्यावर भर दिला जात असल्याचे दिसत आहे. त्यासाठी त्यांच्या वाहतुकीचा खर्चासह विविध प्रलोभणे दाखवले जात आहे. कोरोनाकाळात जीवाच्या आकांताने भीतीपोटी खटाव तालुक्यातील नागरिक मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादसह इतरत्र शहरात नोकरी व्यवसायासाठी गेलेले आहेत. अचानक करोना महामारीने डोके वर काढल्याने शहरी भागात वास्तव्य करणार्या या नागरिकांना एकदम गावाची आठवण झाली. कुटुंबांना घेऊन ते गावाकडे आले. परंतु करोनाच्या भीतीने आधीच हादरून गेलेल्या गावकर्यांनी गावात बाहेरच्यांना गाव प्रवेशबंदी केली. रात्री अपरात्री तरुणांनी गावाबाहेर खडा पहारा देऊन शहरातील येणार्या लोढयांना गावाबाहेर थोपवले होते. आता याच पाहुण्यांचे ग्रामपंचायत निवडणुकीत महत्त्व वाढले आहे. ज्यांनी गावबंदी केली, आता तेच मतांसाठी, इलेक्शनला गावाकडे या म्हणून पायघडया घालत आहेत.
खटाव तालुक्यातील 90 गावांच्या निवडणुकीचा धमाका सुरू झाला आहे. गावातील 12 ते 13 टक्के मतदार पुण्या -मुंबईसह इतर ठिकाणी उदरनिर्वाहासाठी गेले आहेत. मात्र त्यांची नावे गावातील मतदार यादीत असल्याने या बाहेरच्या पाहुण्याना आता भलतेच महत्व आले आहे. कोरोनाच्या लॉकडाऊन काळात याच बाहेरच्या पाहुण्यांमुळे गावात करोनाचा प्रादुर्भाव वाढेल, या भीतीने खटाव तालुक्यातील अनेक गावांनी आपल्या गावाच्या वेशी, काही गावांनी गावात येणारे रस्ते बंद केले होते. पुणे, मुंबई, नाशिकसारखी मोठे शहरे, करोनाच्या विळख्यात अडकल्याने जीवाच्या आकांताने ही बाहेरचे पाहुणे मंडळी गावाकडे मोठ्या आशेने गावाकडे पोहोचली. मात्र गावात येताच आपल्या गावाचे दारे व रस्ते आपल्यासाठी बंद करण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात येताच आभाळ कोसळल्यासारखे दुःख त्यांना अनुभवास मिळाले. लॉकडाऊन संपले, करोनाचे सावटही कमी झाले, मात्र गावबंदीच्या मनाला झालेल्या जखमा, बाहेरच्या पाहुण्याच्या मनात कायम राहिल्या. खटाव तालुक्यात यावेळी सर्वच गावातील निवडणुका अटीतटीच्या होणार असल्याने आणि त्यातच एका आपल्या कुटुंबीयांना घेऊन गावातील तब्बल 13 टक्के मतदार बाहेर असल्याने एकाएका मताला मोठे महत्व आले आहे. ज्यांच्यासाठी काही महिन्यापूर्वी गावबंदी करण्यात आली, आज त्यांचीच मोठया मायेने विचारपूस करण्यात येत आहे. इतकेच नाहीतर ज्यांना गावात येण्यास बंदी घालण्यात आली होती. आता मतांसाठी त्यांच्या पुढे पायघडया घालण्याची वेळ गावातील नेत्यांवर आली आहे. इलेक्शनला नक्की या म्हणून हात जोडून विनवण्या सुरू झाल्या आहेत. या निमित्ताने गावगाड्याच्या घडामोडीने भलताच वेग घेतल्याचे दिसत आहे. जसजसे निवडणुकीचे दिवस जवळ येईल तसतसे निवडणुकीच्या लढतीची रंगत वाढणार आहे. खटाव तालुक्यातील बहुतेक गावांच्या वेशी, गावाचे रस्ते लॉकडाऊन काळात बंद करण्यात आली होती. गावातील पण बाहेर स्थायिक झालेल्या पाहुण्यासाठी गावकर्यांनी यांनी बंद केले होते. वेशीवर तर काही ठिकाणी पत्रे लावून गाव बंद केले होते. तसेच गावात येणार्या रस्त्यांवर दगड, मुरूम टाकून रस्ते बंद केले होते. आता याच पाहुण्यांना गावात येण्यासाठी विनवण्या केल्या जात आहेत. लॉकडाऊन दरम्यान गावकर्यांनी रोखलेला प्रवेश हे अद्याप काही जण विसरू शकलेले नाही, आता आली रे आली माझी बारी आली, असे म्हणत मतदानासाठी यायचे की नाही याचा विचार करावा लागणार आहे, असे बाहेरगावी गेलेले मतदार सांगत आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |