- अजित जगताप
सातारा : जगभर कोरोना संसर्ग रोखण्यासाठी दिवसरात्र शास्त्रज्ञांकडून संशोधन सुरु आहे. जगातील महासत्ता असलेल्या अमेरिकेनंतर भारताचा टॉप टेनमध्ये प्रवेश झाला आहे. त्यामुळे आता सामान्य जनतेला पुन्हा एकदा बंदिस्त प्रार्थनास्थळांकडे धाव घेण्याची वेळ आली आहे. सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचे चौथे शतक पूर्ण होण्याची भीती नजिक आली आहे. जे निगेटिव्ह झाले, ते नशिबवान ठरले आहेत. पण जे कोरोना बाधित झाले आहेत, त्यांची देखभाल होत असली तरी कोरोना रिंगटोनचा सातारा जिल्ह्यात काहींना विसर पडल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याबाबत आता उच्च न्यायालयातच दाद मागण्याची गरज असल्याचे मत आप चे पश्चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार तथा सागर भोगावकर यांनी व्यक्त केले आहे. त्याला अनेकजण दुजोरा देत आहेत.
याबाबत माहिती अशी की, उन्हाळ्यातील मे महिना हा सातारकरांसाठी कमालीचा तापदायक महिना असतो. मात्र यावर्षीचा उन्हाळा हा कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढल्यामुळे जास्तच तापदायक ठरला आहे. सुरुवातीला एक-दोन संख्येने रुग्ण सातार्यात वाढत होते. आता एका दिवसाला अर्धशतकही पूर्ण केले जात आहे, ही धोक्याची घंटा असूनही आरोग्य विभाग, पोलीस दल व जिल्हा प्रशासन जिवाचे रान करीत आहे. त्यांचे श्रेय कधीही नाकारता येत नाही. पण आढीतील एक आंबा नासका निघाला तर संपूर्ण आढीला तो नासवतो, तशी अवस्था क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय सर्वसाधारण रुग्णालयात पहावयास मिळत आहे. ज्यांचा वशिला मोठा, त्यांना आराम मोठा. ज्यांना कोणताच आधार नाही, त्यांना मात्र दिवसरात्र काम करावे लागते. पूर्वी केसपेपर काढण्यासाठी अडीचशे ते तीनशे रुग्ण व त्यांचे नातेवाईक रांगेत उभे असायचे. पण आता या रुग्णालयात कोरोना बाधित कक्ष उभा केल्यापासून इतर आजारांचे रुग्ण याठिकाणी येण्यास धजावत नाहीत. एखाद्या गावातील रुग्णाचा अहवाल बाधित आल्यानंतर त्याला एकट्याला शासकीय रुग्णवाहिकेतून थेट कोरोना बाधित कक्षामध्ये दाखल केले जाते. याठिकाणी त्याच्या विविध चाचण्या घेवून त्यानंतर त्याची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी औषध दिले जाते.
सातारा शहर व परिसरात रुग्णांची संख्या कमी असली तरी जावली, पाटण, कराड, खटाव, माण, खंडाळा, महाबळेश्वर, वाई, कोरेगाव, सातारा तालुक्यांतील कोरोना बाधित रुग्ण हे कृष्णा वैद्यकीय महाविद्यालय कराड व सातारा शासकीय रुग्णालय याठिकाणी दाखल केले जातात. मुळातच रुग्णासोबत कोणीही नातेवाईक नसल्यामुळे रुग्णाची मानसिक स्थिती खालावलेली असते. त्याच्या मनात भय निर्माण होते. यावर मात करण्यासाठी बिमार से नहीं, बिमारी से लढना है, हा संदेश देशभर देण्यात येत आहे. पण याचा विसर सातार्यात काहींमुळे पडल्याची चर्चा होवू लागली आहे. काही रुग्णांनी अजाणतेपणी टॉवेल, अंतरवस्त्रे आणलेली नसतात. दोन वर्षाचे बालक गेली तीन दिवस एकाच कपड्यामध्ये वावरत आहे. अशावेळी त्या परिसरातील सफाई कामगार, परिचारिका, वार्ड बॉय, सुरक्षा रक्षक व बंदोबस्तातील पोलीस मानवता भावनेतून संबंधित रुग्णापर्यंत साहित्य पोहोचविण्याचे काम करतात. त्यामुळे मानसिकरित्या आपल्या पाठिशी कोणीतरी आहे, ही भावना रुग्णाच्या मनात उभी राहते. त्याच्या डोळ्यामध्ये अश्रु उभे राहतात. हे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे आहे. पण काहीवेळेस त्याठिकाणी उपस्थित असलेले त्याच रुग्णालयातील इतर कर्मचारी ‘हे माझे काम नाही’ असे सांगून रुग्णाच्या मदतीसाठी आलेल्यांना धुडकावून लावतात. खरे म्हणजे या रुग्णालयामुळे अनेकांना मानवी सेवा करण्याची संधी मिळते. तसेच आपला संसारही चालवला जातो. काहींचा कपड्याचा व्यवसाय, ठेकेदारीचाही व्यवसाय राजरोसपणे होत आहे. याकडे लक्ष देण्याची आता गरज निर्माण झाली आहे. येथील चतुर्थश्रेणी कर्मचारी हा थेट अपघाती व कोरोना बाधित मृतकांशी सामना करीत असतो. तरीसुद्धा तो कधीही प्रकाशात येत नाही. पण ज्यांच्या हातात सत्ता आणि खुर्ची आहे, त्यांचा फोटो व नामोल्लेख सातत्याने होत असतो.
जिल्हा माहिती कार्यालयामार्फत कोरोना बाधित वस्तुनिष्ठ माहिती देताना गेल्या दोन महिन्यात प्रमुखांचा उल्लेख होतो. ही बातमी दीडशे ग्रुपमधून हजारोवेळा व्हायरल केली जाते. पण अद्यापही कोरोना बाधित कक्षामध्ये सेवा मिळते की नाही, याचे ऑडिट केलेले नाही. मात्र रुग्ण बरा झाल्यानंतर आपल्यामुळेच बरा झाला, असे म्हणत टाळ्या वाजवणार्यांची गर्दी मात्र वाढत आहे. त्या मुखवट्या मागचे चेहरे उघडे करण्यासाठीच आता आप आघाडी घेणार असल्याचेही सागर भोगावकर यांनी सांगितले आहे.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |