प्रकाश राजेघाटगे
बुध : सन २०१४ साल हे भारताच्या राजकीय इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून भविष्यात नोंदले जाईल हे त्रिकालाबाधित सत्य आहे. कारण त्यापुर्वी गेल्या ३० वर्षात कुठल्याच राजकीय पक्षाला लोकसभेत पुर्ण बहुमत मिळाले नव्हते. ही किमया त्यावेळेचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने केली. त्यानंतरच्या काळात गेली सहा वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे वारू चौफेर उधळत आहे. या सत्तारूपी अश्वाला लगाम घालण्याची ताकद सध्यातरी कुठल्याच पक्षात दिसत नाही. तरीही हा घोडा किती वर्षे पळू शकतो व याला रोखायचे असेल तर नक्की काय उपाययोजना कराव्या लागतील, यासाठी गेल्या सहा वर्षांचा लेखाजोखा तपासला पाहिजे, हे मान्य करावे लागेल.
सत्तेचा अमरपट्टा कुठल्याच पक्षाला भेटत नाही, असे प्रत्येकजण म्हणत असतो. पण २०१४ नंतर भाजपा पुढे तितक्याच ताकदीचा विरोधी पक्ष नसल्याने २०१९च्या लोकसभा निवडणुकीनंतरही भाजपाचे नुकसान न होता फायदाच झाला हे आकडेवारीवरून दिसत आहे. मधल्या काळात अनेक राज्यांत विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व प्रादेशिक पक्षांची सरकारे सत्तेवर आली. पण काही ठिकाणी पक्षांतरे घडवून, तर काही ठिकाणी जोरदार विरोध करून राज्य सरकारला नामोहरम करण्यासाठी पध्दत भाजपने अवलंबली आहे. त्यामुळे ग्रामीण ते लोकसभापर्यंत सर्व काही भाजपात दिसून येत आहे. यात भाजपाचे निवडणूक लढण्याचे नियोजन जसे कारणीभूत आहे तसाच हिंदुत्व हा मुद्दाही तितकाच महत्त्वाचा आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर सर्व निवडणूका ह्या अल्पसंख्याक व मागास वर्ग समोर धरून लढविण्याचे धोरण काँग्रेस व इतर पक्षांनी अवलंबिले होते. अल्पसंख्याक व मागास घटक हा काँग्रेस पक्षाची वोट बँक झाली. पण यामुळे बहुसंख्येने असलेल्या हिंदू समाजाचे प्रश्न उपस्थित होतील असे कुणालाही वाटले नाही. हिंदू या अस्मितेला चेतवण्याचा पहिला प्रयत्न केला तो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी. हिंदू म्हणून लोक मतदान करुन उमेदवार जिंकू शकतात हे सिद्ध झाल्यानंतरच शिवसेना या प्रादेशिक पक्षाचे प्रमुख अखंड हिंदुस्थानचे हिंदूह्रद्यसम्राट झाले ही गोष्ट चाणाक्ष भाजपावाल्यांनी ओळखली व संपूर्ण भारतभर हिंदुत्वाची मक्तेदारी स्वतःकडे कशी राहील याची पूर्ण खबरदारी घेतली. यातूनच पुढे राममंदिर आंदोलन झाले व त्याची परिणिती बाबरी मशिद पाडली गेली. पण शिवसेना प्रादेशिक पक्ष अथवा हिंदू मतात फुट नको म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे १९८४ साली एकक मध्ये असलेली भाजपा १९९६ साली याच हिंदू मतांमुळे सत्तेवर आली. हा झाला इतिहास!!!
सन २००२ साली झालेल्या गोध्रा हत्याकांडानंतर नरेंद्र मोदी यांचे धोरण कट्टर हिंदुत्ववादी आहे अशी धारणा समाजात पक्की झाली आणि यांचीच परिणिती म्हणून की काय पण २०१४ साली नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले.
त्यानंतर प्रत्येक निवडणुकीत भाजपने हिंदू मतांचे ध्रुवीकरण करून जागा जिंकल्या हेच दिसून येत आहे. म्हणून तर राहुल गांधी यांच्या सारख्या नेत्यांनाही हिंदू मतांमुळे मंदिर प्रवेश हा निवडणुकीचा कार्यक्रम करावा लागला. हे गुजरात विधानसभा निवडणुकीत सिध्द झाले आहे आणि तसाच प्रयत्न चालू विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी करत आहेत. याआधी हिजाब परिधान केलेले ममता दीदीचे फोटो निवडणूक काळात दिसत होते. पण आता मंदिर प्रवेशाचे दिसत असले तर या देशात पुढील निवडणूकीत बहुसंख्य हिंदू समाजाला लक्ष केंद्रित करुन लढविल्या जाणार हे आपोआप सिध्द होत आहे. यामध्ये MIM या पक्षालाही विसरून चालणार नाही. कारण इतकी वर्षे मुस्लिम समाज हा काँग्रेसला मतदान करत होता. MIM च्या उदयानंतर मुस्लिम मते MIM या पक्षाकडे वळली आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाला स्वतःची वोट बँक वाढविण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागणार आहेत. कारण त्याशिवाय भाजपा समोर मजबूत विरोध पक्ष म्हणून कॉग्रेस उभा राहू शकत नाही किंवा मग भाजपा कडक हिंदुत्ववादी पक्षाशी युती किंवा आघाडी करून देशव्यापी लढा उभारणे हाच पर्याय उपलब्ध असणार आहे. सापाचे विष उडविण्यासाठी त्यापेक्षाही कडक सापाचे विष द्यावे लागते. त्याचप्रमाणे भाजपचे हिंदुत्व झाकोळून देण्यासाठी भाजपा पेक्षाही कट्टर हिंदुत्ववादी अशा शिवसेनेची गरज आजतरी विरोधी पक्षांना आहे, हे मान्य करावेच लागेल. आज जो प्रयोग महाराष्ट्रात तिन्ही विरोधी पक्षांनी राबविला आहे काहीसा तसाच प्रयोग देशात राबविण्यात आला तर भाजपा पराभूत होऊ शकतो. हे साध्य करताना शिवसेनेची हिंदुत्ववादी भूमिका घेऊनच केले तर ठीक होईल. नाहीतर हिंदुत्ववादी मतांचे ध्रुवीकरण करणे आज मितीस शिवसेना सोडून कुठल्याच पक्षाला शक्य नाही.
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |