मुंबई : थकबाकीदार शेतकर्यांना यंदाच्या खरिपात पीक कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत राज्य शासनाने ग्रामीण, व्यापारी व सहकारी बँकांना शुक्रवारी आदेश दिले आहेत. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेतील पात्र शेतकर्यांच्या खात्यात जरी कर्जमाफीची रक्कम अद्याप जमा झालेली नसली तरीही अशा थकबाकीदार शेतकर्यांना यंदाच्या खरिपात पीक कर्ज मिळणार आहे. सहकार विभागाने हा निर्णय घेतला असून ग्रामीण, व्यापारी व सहकारी बँकांना राज्य सरकारने शुक्रवारी तसे आदेश दिले आहेत.
ठाकरे सरकारने सत्तेवर येताच शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली होती. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 चा 27 डिसेंबर 2019 रोजी शासन निर्णय जारी झाला. त्यानंतर लाभार्थींच्या याद्या प्रसिद्ध झाल्या. त्यातील 19 लाख थकबाकीदार शेतकर्यांच्या खात्यात सरकारने रक्कम भरली आहे. कोरोना व लॉकडाऊनमुळे सरकारचे आर्थिक स्रोत आटल्याने योजना थंडावली आहे. खरीप हंगाम आला असताना उर्वरित शेतकर्यांच्या पीक कर्जाचा प्रश्न ऐरणीवर होता. त्यामुळे ज्यांचे नाव कर्जमाफी योजनेत आहे, मात्र त्यांच्या थकीत कर्जाचे पैसे अद्याप बँकांना सरकारकडून मिळाले नाहीत अशा सर्व शेतकर्यांना कर्ज द्यावे, असे आदेश सरकारने काढले आहेत.
खरिपासाठी 44 हजार कोटींच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे. आपण थकबाकीदार असल्याने यंदा कर्ज मिळेल की नाही, अशी शंका शेतकर्यांत होती. ती आता दूर झाली आहे. थकीत शेतकर्यांना कर्ज दिल्यास त्याने पूर्वी घेतलेल्या पण अद्याप सरकारने ती रक्कम अदा न केलेल्या रकमेचे 1 एप्रिल 2020 पासूनचे व्याजही सरकार बँकांना देणार आहे.
कर्जमाफीला पात्र आहोत, पण अद्याप खात्यात पैसे जमा झाले की नाही? शेतकरी याची बँकात जाऊन खातरजमा करत होते. नव्या जीआरमध्ये कर्जाची रक्कम सरकारकडून येणे, अशी नोंदवावी, असे आदेश सरकारने काढले आहेत. त्यामुळे कर्जमुक्ती योजनेतील सर्व पात्र शेतकरी आता कर्जमुक्त झाले आहेत.
महात्मा फुले योजनेत पात्र आहे, पण त्याचे पैसे अद्याप सरकारने अदा केले नाहीत, त्यांची खाती एनपीए किंवा थकीतमध्ये आहेत. त्या खात्यांवर सरकारकडून येणे, अशी नोंद करावी आणि संबंधित थकीत शेतकर्यास पीक कर्ज द्यावे, असे आज सहकार विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयात म्हटले आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |