04:36pm | Aug 24, 2020 |
नवी दिल्ली : गुरुवारी सर्वोच्च न्यायालयानं प्रशांत भूषण यांना विनाअट माफी मागण्याचे आदेश दिले होते. अन्यथा सहा महिन्याचा तुरुंगवास, दोन हजार रुपयांचा दंड किंवा दोन्हीही शिक्षेचा इशारा दिला होता. यावेळी, न्यायालयाकडून देण्यात येणार्या कोणत्याही शिक्षेसाठी तयार आहोत, परंतु मी माफी मागणार नाही, अशी भूमिका प्रशांत भूषण यांनी घेतली होती.
न्यायपालिका अवमानना प्रकरणात ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण म्हणालेे की, ‘माझी वक्तव्य सद्भावनापूर्ण होते. माफी मागितली तर माझ्या सदसदविवेकबुद्धीचा तसंच आपण ज्या संस्थेवर सर्वाधिक विश्वास ठेवतो त्याचा अवमान होईल’ असंही त्यांनी म्हटलंय. सर्वोच्च न्यायालयानं प्रशांत भूषण यांना 24 ऑगस्टपर्यंत आपल्या विधानांसाठी पुनर्विचार आणि कोणत्याही अटीविना माफी मागण्यासाठी वेळ दिला होता.
सोमवारी प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयात आपलं उत्तर दाखल केलं. ‘आजच्या चिंताग्रस्त क्षणी भारताच्या लोकांची कशावर आशा असेल तर ती सर्वोच्च न्यायालायावर आहे. ती देशातील निरंकुश व्यवस्थेसाठी नाही तर देशात कायदे व्यवस्था आणि संविधान प्रस्थापित राहवं यासाठी... त्यामुळे जेव्हा गोष्टी आपला मार्ग भटकताना दिसतात तेव्हा आपण बोलातं. या न्यायालयातून मिळालेल्या जबाबदारीची जाणीवच आपल्याला हे विशेष कर्तव्य देते. माझी वक्तव्य सद्भावनापूर्ण होते. मी सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्याही न्यायाधीशांना निशाणा बनवण्यासाठी टिप्पणी केली नव्हती. ती माझी सकारात्मक टीका होती’ असं त्यांनी आपल्या उत्तरात म्हटलंय.
उल्लेखनीय म्हणजे, 2400 हून अधिक भारतीय वकिलांनी प्रशांत भूषण यांच्या समर्थनार्थ ऑनलाईन याचिका दाखल केलीय. तसंच, आज महाराष्ट्रातील पुण्यातही अनेक वकील प्रशांत भूषण यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेले दिसले. शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या आवाराबाहेर वकिलांनी काळ्या फिती बांधून भूषण यांच्याविरोधातील कारवाईचा निषेध केला.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |