सातारा : किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने ऊस उत्पादक शेतकर्यांना एफआरपीची सर्व थकीत रक्कम 30 ऑक्टोंबर 2020 पर्यंत देण्याचे मान्य केली आहे. दरम्यान दसर्या पूर्वी शेतकर्यांना किती रक्कम देणार याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कारखाना व्यवस्थापनाला मागितली आहे. त्यामुळे कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांच्या निवासस्थानासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेले आंदोलन तात्पुरते मागे घेतले आहे. मात्र विहित वेळेत शेतकर्यांचे पैसे न मिळाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
काल दि. 20 रोजी किसनवीर सह. साखर कारखान्याने थकवलेल्या 35कोटींच्या एफआरपी संदर्भात जिल्हाधीकारी शेखरसिंह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हानियोजन भवनात बैठक झाली. या बैठकीला जिल्हा पोलीसप्रमुख अजयकुमार बंन्सल,उपजिल्हाधीकारी सुनील थोरवे,स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके,अर्जुनराव साळुंखे,अॅड.विजय चव्हाण,रमेश पिसाळ,संजय जाधव, हेमंत खरात उपस्थित होते.या बैठकीत थकीत ऊसबीलासंदर्भात कोणताही ठोस असा निर्णय झाला नाही. कारखाना व्यवस्थापनाने बँकेच्या लोनची कारणे देत थकीत एफआरपी लवकरात लवकर देण्यास असमर्थता दाखवली. दि. 30 ऑक्टोबरपर्यंत ऊस थकित पोटी शेतकर्यांची सर्व देनी देण्याचे आश्वासन कारखाना व्यवस्थापनाने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी आक्षेप घेत यापुर्वीही कारखाना व्यवस्थापनाने पैसे देण्याचा शब्द दिला होता परंतु त्याचे पालन केले नाही. हे प्रशासनाच्या निदर्शनास आणुन दिले. वर्षातील मोठ्या सणापैकी दसरा हा सन काही दिवसांवर येवुन ठेपला आहे. अशावेळी शेतकर्यांच्या हातावर चार पैसे असावेत. यासाठी कारखाना व्यवस्थापनाने दोन दिवसात किमान 10 कोटींची देणी पुर्ण करावीत व उर्वरीत रक्कम 30 ऑक्टोंबरपुर्वी द्यावी, अशी मागणी केली. या बैठकीचे प्रोसेडींग तयार करण्यात झाले असुन आता जिल्हाधिकार्यांना आरआरसीचे अधिकार प्राप्त झाले आहेत. त्यामुळे दिलेल्या वेळेत एफआरपी न दिल्यास कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला आहे. या बैठकीला साखर आयुक्तांकडुन कोणीही सक्षम अधिकारी बैठकीला उपस्थित राहिला नव्हता. सातारा येथील लेखाविभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते मात्र त्यांना काहीच समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. मुळात साखर आयुक्तांचीच महत्वाची जबाबदारी असल्याने त्यांनीच सात महिने दिरंगाई केल्याने ऐन सणासुदीच्या काळात,कोरोना महामारीत गेली 17 दिवस रस्त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांना आंदोलन करावे लागले हे खुप मोठे दुर्दैव आहे, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांनी नोंदवले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |