05:57pm | Sep 13, 2020 |
अजित जगताप
सातारा : गेली तीन वर्षे मराठा समाजाला घटनात्मक आरक्षण मिळवून देण्यासाठी सर्व समाज एकवटला. आंदोलन, मौर्चे निघाले. पण,सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली. महाराष्ट्रात निवडणुकीत जिंकले, न्यायालयात हरले, अशी आता चर्चा सुरू झाली आहे.
कोपर्डी बालिका हत्याने राज्यात मराठा समाज आक्रमक पवित्रा घेऊ लागला. त्यानंतर कोपर्डी प्रकरणातील आरोपीच्या निषेधार्थ महाराष्ट्रात अनेक आंदोलने झाली. त्यातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी पुढे आली. याला काही अपवाद वगळता इतर सर्व समाज्याने जाहीर रित्या पाठींबा दिला. मराठा क्रांती मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्या ला सर्व राजकीय पक्ष व संघटनेतील लोक सामील झाले होते. ‘‘एक मराठा,, लाख मराठा’’ ही टॅग लाइन म्हणजे मराठा अस्मिता ठरली आहे. याचा सार्थ अभिमान वाटत आहे.. आज ही अनेक राजकीय व सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आपल्या चारचाकी, दुचाकी वाहनांवर ही टॅग लाइन लावून हिंडत आहेत. त्यांच्या सोबत खरोखरच आरक्षणाची गरज असलेले ग्रामीण भागातील शेतकरी व गरीब मराठा बांधव सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नाराज झाले आहेत. ज्यांनी निवडणुकीत आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा समाजाची मते पदरात पाडून घेतली असे सर्व पक्षीय कार्यकर्ते व त्यांना पाठींबा देणार्या इतर समाज्याला सुध्दा या निर्णयामुळे धक्का बसला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष म्हणजे खर्या अर्थाने मराठा समाजाला आपुला वाटत आहे. त्या खालोखाल राष्ट्रीय कॉंग्रेस पक्ष वाटतो. या दोन्ही पक्षाच्या सोबत शिवसेना सत्ताधारी लोकप्रतिनिधी व त्यांचे समर्थक कार्यकर्त्यांनी आता सरकार दरबारी अध्यादेश काढावा किंवा असहकार आंदोलन करावे अशी अधिकृत मागणी पुढे आली आहे.मुळातच सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करताना मराठा आरक्षणाची बाजू मांडली जात होती. तेव्हा मराठा समाज व त्यांना पाठींबा देेणारे खासदार किंवा दिल्ली वारी करणारे मंत्री, आमदार किती वेळा सर्वोच्च न्यायालयात गेले ? याबाबत वकिलांच्या सोबत चर्चा केली?याचा तपशील मराठा तरुण मागू लागले आहेत. यशाला सर्व वाटेकरी असतात पण, अपयशला जबाबदार कोण? याचा शोध आणि बोध घेणे गरजेचे आहे.असा ही सूर राज्यातील ग्रामीण भागात उमटत आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचे विधेयक मंजूर करण्यात आले. राज्यपाल महोदयांनी या विधेयकावर सही केली. राजपत्रित जाहीर झाले. ही आनंदाची बाब असली तरी मराठा समाजातील बेचाळीस तरुणांचे बळी गेले. सोळा हजार सातशे गुन्हे दाखल करण्यात आले.
मराठा समाजातील बळी गेलेल्या तरुणांच्या नातेवाईकांना दहा लाख रुपये व सरकारी नोकरी ही घोषणा झाली. मेगा भरती ची लाट तयार केली. शैक्षणिक 12 टक्के व नोकरीत-तेरा टक्के आरक्षण जाहीर केले. आकडेवारी नुसार ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य विभाग, गृह कृषी, पशुसंवर्धन, जलसंधारण जलसंपदा, मत्स्यव्यवसाय नगरविकास विभाग मधील सुमारे चौतीस हजार नोकर्यांची आमिषे दाखवून दिली. या गोष्टी राज्य सरकारने एका अध्यादेशाने करून दाखविले असते. पण ते घडले नाही. ही वस्तुस्थिती मराठा समाजाला समजली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अध्यादेश काढण्याची खेळी सुरू झाली आहे. ती यशस्वी होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न कराच. अन्यथा निवडणूक युद्धात जिंकले, सर्वोच्च न्यायालयाच्या लढ्यात हरले. याची नोंद मराठा समाज व आरक्षणाला पाठींबा देणारे सर्व घटक पक्ष, संघटना घेईल असे मत सातारा जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चा समर्थक तरुण देवराज खंडाईत, अजित निकम, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रमेश अनिल उबाळे, शिवाजीराव शिंदे व शेतकरी संघटनेचे बाळासाहेब चव्हाण व इतरांनी व्यक्त केले आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |