09:43pm | Feb 27, 2023 |
फलटण : सातारा लोकसभा मतदारसंघ असताना व आत्ता माढा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेला फलटण तालुका, फलटण म्हटले की राजकीय वलय असलेला व सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारा तालुका म्हणून संपूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्रात ओळखला जात होता. मात्र सध्या तो ओळखला जातोय तो माढा लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या दैदिप्यमान कामाने. त्यातच रणजितदादांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, मला टीका टिप्पणी करण्यात वेळ घालवायचा नाही, मला फलटण तालुक्याचा विकास करायचा आहे, असे सांगून विरोधकांना चितपट केले व त्यांच्या या शब्दाने तालुक्यातील जनतेची मने जिंकली आहेत.
गत दोन वर्षांपूर्वी कोविड-19 मूळे अनेक विकासकामे करताना मर्यादा आल्या होत्या. त्याचे कारण म्हणजे लोकांचे जीव वाचवण्यासाठी केंद्रातून निधी पाहिजे, एवढा उपलब्ध होत नव्हता. तसेच राज्यात भाजपचे सरकार नसल्याने निधी दिला जात नव्हता. आता केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असून शेतीला पाणी, आरोग्यसेवा, रस्ते, रेल्वे, एमआयडीसी व इतर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ते अहोरात्र झटत असून त्यांच्या कामाने फलटण तालुक्यातील जनतेला नवीन आशेचा किरण दिसत असून दादा आता तुम्ही फक्त हाक द्या आम्ही तुम्हाला साथ देऊ, असे बोलून दाखवीत आहे.
धरण उशाला आणि कोरड घशाला, जमिनी फलटण तालुक्यातील शेतकर्यांच्या, पुनर्वसन फलटण तालुक्यात, निधी सातारा जिल्ह्याचा आणि ते पाणी मात्र इतरांना अशी अवस्था झाली होती. कालवे पूर्ण होऊ नयेत म्हणून राजकीय व शासकीय कागदी घोडे नाचवून फलटणच्या जनतेला व शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम तब्बल 20-25 वर्षे सातत्याने सुरू होते. काही काळ अपवाद वगळता फलटण च्या जनतेला तोंड दाबून बुक्क्यांचा मार खावा लागला होता. मात्र ना.देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री होताच खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांची माढा लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यातील शेतकर्यांची शेतीच्या पाण्यासाठी वणवण पहावी वाटत नव्हती, आणि दादा नेहमीच राज्य सरकारच्या माध्यमातून पाठपुरावा करीत होते. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आणि नीरा देवघर प्रकल्पाला सुधारित मान्यता मिळून 3200 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होईल, असे सातारा जिल्हा सुपुत्र मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी सांगत खासदारांची अनेक दिवसांची मागणी पूर्ण केली.
मग खासदारांनी युवकांना नोकरी मिळाली पाहिजे, यासाठी जुनीच मागणी असलेल्या नाईकबोमवाडी एमआयडीसी चे स्वप्न सत्यात उतरवले आणि त्या मध्ये तब्बल वीसहून अधिक मल्टिनॅशनल कंपनी त्यामध्ये येणार असून फलटण तालुक्यातील तब्बल 4 हजार हुन अधिक मुलांना त्यामध्ये नोकर्या मिळणार आहेत. तसेच आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा ग्रामीण भागातील व शहरी भागातील लोकांसाठी रुग्णालय असणं गरजेचं होतं. म्हणून राज्य शासनाकडे पाठपुरावा करून 65 कोटी रुपये मंजूर करून घेतले व लवकरच त्याचा आराखडा होऊन कामाला सुरुवात होईल. आळंदी -पंढरपूर महामार्ग मंजूर झाल्यामुळे अनेक वारकरी या रोडने पंढरपूर कडे जात असतात. या वारकर्यांसाठी फलटण तालुक्यामध्ये दोन वारकरी भवन मंजूर झाले असुन लवकरच कामाला सुरुवात होईल, अशी माहिती भाजप तालुका अध्यक्ष बजरंग गावडे व शहराध्यक्ष अमोल सस्ते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |