02:21pm | Jun 04, 2022 |
नवी दिल्ली : टाटा आयपीएलचा अंतिम सामना संशयाच्या गर्तेत सापडला आहे. भाजप नेते, खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व त्यांचे पुत्र तथा बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्यावर टीकेचे यॉर्कर टाकून खळबळ उडवून दिली आहे. अंतिम सामन्यात फिक्सिंग झाल्याचा सनसनाटी आरोप स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे. त्यांनी बीसीसीआयच्या एकूण कार्यपद्धतीवरच शंका व्यक्त केली आहे. त्यासाठी त्यांनी गुप्तचर संघटनांच्या इनपुटचाही हवाला दिला आहे.
आयपीएल फायनलमधील घोटाळय़ाची चौकशी व्हावी, याप्रकरणी न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याची गरज आहे, असे ट्विट करीत स्वामी यांनी आयपीएलच्या माध्यमातून आपल्याच पक्षाचे नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व त्यांचे चिरंजीव जय शहा आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यांच्यावर टीकास्त्र् सोडले.
तर अमित शहा यांना क्रीडामंत्रीपद द्यावे - स्वामी
जम्मू-कश्मीरमध्ये सध्या राष्ट्रपती राजवट आहे आणि तरीदेखील प्रत्येक दिवशी एका कश्मिरी हिंदूची गोळय़ा घालून हत्या केली जात आहे. यासाठी आता अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी करणे गरजेचे झाले आहे किंवा त्यांना क्रीडा मंत्रालय दिले जावे. कारण आजकाल त्यांना क्रिकेटमध्ये अधिक रस वाटू लागला आहे, असे सुब्रमण्यम स्वामी म्हणाले. अमित शहा 29 मे रोजी झालेल्या आयपीएलच्या 15 व्या हंगामाची फायनल मॅच पाहण्यासाठी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गेले होते. कश्मीर खोऱयात दहशतवादी हिंदूंच्या टार्गेट किलिंगचे थैमान माजवत असताना देशाचे गृहमंत्री आयपीएल फायनलचा आनंद लुटण्यासाठी कसे जातात, असा संतप्त सवालही खासदार स्वामी यांनी केला.
बीसीसीआयवर प्रश्नांचा भडिमार
खासदार स्वामी यांच्या ट्विटरवरील पोस्टमुळे आता एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे. त्यांच्या पोस्टनंतर चाहते सोशल मीडियावरून युजर्स बीसीसीआय, राजस्थान रॉयल्स यांनाही प्रश्न विचारत आहेत. एका युजरने राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन याला टॅग करीत सवाल केलाय की, नाणेफेक जिंकूनदेखील प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय का घेतलास?
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |