पुसेगाव : गावाचा विकास म्हणजे फक्त भौतिक विकास नसून आर्थिक विकास आणि मानवी विकास सुद्धा महत्वाचा आहे. मानवी विकासातूनच शाश्वत विकास साधला जातो, असे प्रतिपादन निवृत्त विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी केले.
ते सायबर काॅलेज कोल्हापूर येथे सरपंच संवाद कार्यशाळेत बोलत होते. अध्यक्षस्थानी सायबर महाविद्यालय कोल्हापूर चे संचालक डॉ. एस. पी. रथ होते.
सायबर काॅलेज कोल्हापूर आणि आमचा गाव, आमचा विकास यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय सरपंच संवाद कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत दळवी यांनी उपस्थित सरपंचांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, निवडून आलेल्या सरपंच आणि सदस्य यांनी ही पहिली आणि शेवटची संधी समजून काम करायला पाहिजे. योग्य नियोजनातून मिळालेल्या कार्यकाळात विकास करता येतो. पैशाशिवाय सुद्धा गावचा विकास साधला जातो. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान ही पैशाशिवाय यशस्वी झालेली योजना आहे. आर्थिक आणि मानवी विकासासाठी मोठ्या निधीची नव्हे, तर दूरदृष्टीच्या नेतृत्वाची गरज आहे. पिण्याचे पाणी, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. त्याचा पाठपुरावा करावा. कार्यकाळ संपला तरी काम थांबवू नका.
कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ संजयसिंह चव्हाण, निवृत्त उपजिल्हाधिकारी विवेक आगवणे, सरपंच परिषदेच्या अध्यक्षा राणीताई पाटील, जिल्हा अध्यक्ष सागर माने यांनी मनोगत व्यक्त केले. सायबर काॅलेज दिनकरराव शिंदे समाजकार्य विभाग प्रमुख डॉ. डी. एम. भोसले, आमचा गाव आमचा विकास चे प्रभाकर पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |