08:04pm | Sep 18, 2022 |
खटाव : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारमुळे देशात आमूलाग्र बदल होवून अर्थव्यवस्था मजबूत होत आहे. सर्वच पातळ्यांवर देशाची प्रगती होत आहे. भाजपमध्ये घराणेशाहीला थारा नाही. मात्र कॉंग्रेससह राज्यातील राष्ट्रवादीच्या बारामती आणि फलटणकरांची घराणेशाही मात्र एकदम ओक्केच असल्याचा टोला भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांनी लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून सुरु झालेल्या राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याची सुरुवात करताना ते फलटण तालुक्यातील विविध गणांमधील मेळाव्यात बोलत होते.
कार्यक्रमाला खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, भाजपाचे संघटक सरचिटणीस शेखर वडणे, जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे,तालुकाध्य बजरंग गावडे, विश्वासराव भोसले, पिंटू हिवरे तसेच तालुक्यातील भाजपाचे सर्व पदाधिकारी, गावोगावचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. गोरे पुढे म्हणाले, देश आणि राज्य प्रगतीपथावर नेणाऱ्या भाजपावर जनतेचा मोठा विश्वास आहे. विरोधी पक्षांमधील अनेकजण भाजपाचे कमळ हाती घेत आहेत. आता फलटण तालुक्यातील भाकरी फिरवायची वेळ आली आहे. सगळीकडे एकाच कुटुंबातील व्यक्ती विविध पदे भूषवित आहेत. रामराजेंची घराणेशाही तालुक्यात सुरु असल्याने कुवत असणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांवर कित्येक वर्षे अन्याय होत आहे. त्यांनी सामान्य माणसाला कधी संधीच दिली नाही. इथल्या जनतेला आता आरपारची लढाई लढून तालुक्यात आमदारकीपासून जिल्हापरिषद, पंचायत समितीसह नगपालिकेतही बदल करायची वेळ आली आहे.
माण तालुक्यात सदाशिव तात्यांची चाळीस वर्षे निष्क्रिय सत्ता होती. तालुक्याचा विकास ठप्प झाला होता. माणच्या स्वाभिमानी जनतेने १३ वर्षांपूर्वी बदल करुन सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला आमदार केले. आज तालुक्याचे आणि मतदारसंघाचे चित्र बदलले आहे. गावागावात कोट्यवधींची विकासकामे मार्गी लागली आहेत. रस्त्यांचे जाळे निर्माण झाले आहे. विविध योजनांचे पाणी पोहचले आहे. सर्वत्र ऊसाची बागायती शेती पिकू लागली आहे. चार साखर कारखाने सुरु आहेत. मात्र फलटण तालुक्यातील रामराजेंनी अनेक वर्षे सत्तेत राहून, मंत्रीपदे भोगून काहीच केले नाही हे दुर्दैव आहे. लोकांनी त्यांच्यावर अवलंबून राहून त्यांच्या दारात हांजी हांजी करायला गेले पाहिजे अशी त्यांची वृत्ती असल्याने घराणेशाही बोकाळली आहे. येणाऱ्या सर्वच निवडणूकांमध्ये फलटण तालुक्यातील जनतेने सर्वसामान्यांची आणि भाजपाची ताकद दाखवत सामान्य माणसांचे राज्य आणावे, असे आवाहनही त्यांनी केले.
खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, केंद्रात आणि राज्यात आपली सत्ता असल्याने आम्ही विकासकामात कुठेच कमी पडणार नाही. केंद्राच्या जलजीवन, आयुष्यमान अशा अनेक योजना जनतेच्या जीवनात आमूलाग्र बदल करत आहेत. आम्ही केंद्राच्या माता-भगिनींसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी असणाऱ्या सर्वच योजना प्रभावीपणे राबविण्यावर भर देत आहोत. फलटण तालुक्यात एमआयडीसी, रेल्वे, फोरलेन रस्त्यांची कामे मार्गी लागत आहेत. ज्यांनी आजपर्यंत तालुक्याला लुटले, त्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी आम्ही वज्रमुठ बांधली आहे. येणाऱ्या काळात त्यांना जशास तसे उत्तर देवू. तालुक्यातील गावोगावी विकासपर्व उभे करण्यासाठी आगामी काळात भाजपाचे पक्षसंघटन मजबूत करण्यावर आम्ही भर देत आहोत. जनता भाजपाच्या पाठिशी मोठी ताकद उभी करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
फलटणमधील मेळाव्यांना मोठा प्रतिसाद...
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा पंधरवडा मेळाव्यांना फलटण तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळाला. लोकांनी भाजपाच्या माध्यमातून देशात करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे बारकाईने अवलोकन केले. मोदी आणि केंद्र सरकारवर जनतेने विश्वास दाखविल्याने देशाची झालेली प्रगती चित्ररथ आणि व्हिडिओ क्लीपच्या माध्यमातून पाहण्यासारखी सर्वत्र गर्दी झाली होती.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |