03:05pm | May 28, 2020 |
सातारा : सध्या संपूर्ण देशासह राज्यातही कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉक डाऊन असल्यामुळे कोरोना विषाणूचा मुकाबला विद्यार्थीही घरात राहुनच करताहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यामधील विद्यापीठांच्या अंतीम वर्षाच्या पदवी परीक्षा रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी माढा लोकसभा मतदारसंघाचे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेवून व निवेदन देवून केली.
यावेळी खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी राज्यपालांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेवून शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता अंतीम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात याव्यात, तसेच शिक्षणाच्या निमित्ताने अनेक विद्यार्थी लॉक डाऊनमुळे राज्यासह देशाच्या विविध भागांत अडकून पडलेले आहेत. तर काही विद्यार्थी आपापल्या परिने घरी रवाना झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे परीक्षेसाठी लागणारी अभ्यासाची पुस्तके व इतर स्टडी मटेरीअल सोबत नसल्याने विद्यार्थ्यांच्या मनामध्ये मोठी तणावाची व द्विधा मनस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे परीक्षा घेतली तरी अनेक विद्यार्थी विनातयारी परीक्षा देऊ शकणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थी व त्यांच्या आरोग्याच्या हिताचा विचार करुन राज्य शासनाने कोणतेही राजकारण न करता विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा. परीक्षा लांबल्यामुळे त्या परत घेण्याचा निर्णय झाला तर आगामी वर्षाचे शैक्षणिक वेळापत्रक पूर्णपणे कोलमडून जाणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे राष्ट्रीय आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून विद्यापीठ अनुदान आयोगानेही या प्रकरणात लक्ष घालून विद्यार्थ्यांच्या सरसकट पदवी परीक्षा रद्द करुन त्या कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर घेण्यात याव्यात, अशी मागणी खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |