01:34pm | Jul 17, 2020 |
बुध: करोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे कांद्याला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरीवर्ग अडचणीत आला असून साठवलेला कांदा सडू लागल्याने उकिरड्यावर कांदा फेकून द्यायची वेळ येथील शेतकर्यांवर आली आहे. यामुळे पुसेगाव परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याचे चित्र आहे.
खटाव तालुक्यातील उत्तर भागात रब्बी हंगामातील गारवा कांद्याची लागण मोठ्या प्रमाणात होत असते. हजारो एकर क्षेत्रावर गतवर्षी घेतलेला सुमारे पाचशे ट्रक कांदा केवळ दर व मागणी अभावी अद्यापही ऐरणीत पडून आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू होण्यापूर्वी काही दिवस कांद्याला विक्रमी बाजारभाव मिळत होता.
मात्र सद्यस्थितीत विक्रमी बाजारभाव मिळणार्या कांद्यानेच आता कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीसह विविध कारणांमुळे कांद्याचे भाव चांगलेच कोसळले आहेत. यावर्षी उन्हाळी कांद्यांचे चांगले उत्पादन झाले. कांद्याचे बाजारभाव वाढतील या आशेने शेतकर्यांनी तीन-चार महिन्यांपासून ऐरणीत तसेच पुसेगाव येथील मार्केट कमिटीच्या गोडाऊन मध्ये कांदा साठवून ठेवला आहे. हा साठवलेला कांदा सडू लागल्याने मातीमोल भावात शेतकर्यांना कांद्याची विक्री करावी लागत आहे. त्यातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे.
मागील वर्षी पाऊसकाळ चांगला झाल्याने येथील शेतकर्यांनी रब्बीच्या हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड केली होती. कांदा लागवड करणार्या शेतकर्यांचा कांद्याची रोपे तयार करण्यापासून ते लागवड करण्यावर खूप मोठा खर्च झालेला आहे. त्यातच कांद्याचे पीक काढण्यासाठी तयार झाले असतानाच करोनाचे संकट कोसळले. करोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून टाळेबंदी लागू करण्यात आली. यातून शेतीकामे वगळली असली तरी त्याचा विपरीत परिणाम झाला. कांदा काढण्यासाठी वेळेत मजूर मिळाले नाहीत. जे मजूर कामावर आले, त्यांनी दुप्पट मजुरी घेतली. शेतकर्यांनी अथक परिश्रमाने कांदा काढणी केली. मात्र त्यानंतर कांदा विक्रीला काढला असता व्यापारी खरेदी करण्यास फारसे उत्सुक नव्हते. काही व्यापार्यांकडून अत्यल्प भावात कांद्याची खरेदी करण्यात आली. यामुळे काही शेतकर्यांनी कांदा चाळीत साठवला, तर काहींना कांदा साठवण्यासाठी साधन नसल्याने बाजारात जो भाव मिळेल, त्या भावात कांदा विक्री केली. सध्या कांद्याला किलोमागे सहा ते सात रुपये बाजारभाव चालु आहे. कांद्याचा बाजारभावच वाढत नसल्याने साठवून ठेवलेला कांदा शेतकरी विक्रीसाठी काढत आहेत. परंतु शेतकर्यांनी साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणावर सडला असल्याने शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अत्यल्प भावामुळे कांदा उत्पादक शेतकर्यांची कोंडी होताना दिसून येत आहे. टाळेबंदीमुळे कांद्याला मागणी नसल्याने शेतकर्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. शासनाने शेतकर्यांच्या या प्रश्नांकडे लक्ष देऊन याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे.
पाणीपुरीच्या गाडीपासून ते पंचतारांकित हॉटेलपर्यंत सर्वच खाद्यपदार्थ व्यवसायाच्या ठिकाणी कांद्याचा उपयोग होतो. करोनामुळे गत तीन महिन्यांपासून टाळेबंदी लागू करण्यात आल्याने या काळात हॉटेलसह सर्व व्यवसाय, उद्योग ठप्प झाले आहेत. परिणामी, कांद्याची मागणी कमी आहे. उत्पादन जास्त व मागणी कमी असल्याने कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात गडगडले आहेत. त्याचा मोठा फटका शेतकर्यांना सहन करावा लागत आहे.
कोरोनामुळे शेतमाल दरावर विपरीत परिणाम झाला आहे. पावसाळ्यानंतर च्या काळात नागरिकांना कांदा मिळावा तसेच त्यालाही दोन पैसे फायदा मिळावा म्हणून शेतकरी चार महिने कांद्याची साठवणूक करतो,मात्र सध्याच्या परिस्थितीत कांदा विक्रीतून उत्पादन खर्चदेखील फिटत नसल्याने शेतकर्यांच्या आर्थिक अडचणीत भर पडली आहे. कांदा दरवाढीची शक्यता नसल्याने शासनाने कांद्याला हमी भाव ठरवून देणे गरजेचे आहे.
- रामचंद्र घनवट नाना, कांदा उत्पादक शेतकरी, राजापूर
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |