पुसेगाव : सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. खटाव तालुक्यात बहुतांशी ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाची सत्ता आहे. परंतु खटाव राष्ट्रवादीच्या नेत्यामध्ये एकसंघपणा नसल्या कारणाने व पक्षार्तंगत कुरघोडया असल्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असून नेत्यांनी एकसंघ राहणे गरजेचे आहे, असे मत भुरकवडी गावचे माजी सरपंच संभाजीराव उर्फ एस. के. कदम यांनी व्यक्त केले.
भुरकवडी ता. खटाव येथे सातारा जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेसच्या जनसंपर्क अभियान कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नंदकुमार मोरे, सातारा जिल्हा परिषदेचे मा.उपाध्यक्ष प्रदिप विधाते, माजी जि प सदस्य प्रा.एन.एस उर्फ बंडा गोडसे, बाजार समितीचे कार्यकारी उपसभापती तुकाराम यादव, सरपंच छगनराव कदम, चेअरमन दिलीप कदम, शिवाजीराव कदम, मधुकर कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राष्ट्रवादीच्या जनसंपर्क अभियानात मार्गदर्शन करताना मोरे यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडून गावातील अडीअडचणी विषयी माहिती घेऊन त्या पक्षाच्या माध्यमातून वरिष्ठांपर्यत पोहच करणार असल्याचे नमूद केले.
यावेळी प्रा.बंडा गोडसे म्हणाले की, आपल्या गावच्या निवडणुका या नेहमीच बिनविरोध करून या वेळेस ग्रामपंचायतीमध्ये सातही महिला सदस्या देऊन इतर गावासमोर आदर्श निर्माण केला आहे. आपला गाव नेहमी राष्ट्रवादीच्या पाठीशी राहिला असून आपल्या गावातील गट-तट विसरून सर्वांनी पक्षाचे कार्य करावे व गावचा विकास साधावा.
यावेळी माजी सैनिक कैलासराव जाधव, अंकुश लावंड यांचीही मनोगते झाली. यावेळी स्टेट बँकेचे निवृत्त अधिकारी माजी सैनिक चंद्रकांत कदम यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद कदम यांनी केले, तर आभार मनोजदादा कदम यांनी मानले. यावेळी प्रविण कदम, शहाजी कदम, नामदेव कदम, तानाजी कदम, शिवाजी कदम, जालींदर कदम, आप्पाजी कदम, राजेंद्र कदम, सयाजी कदम, संभाजी कदम, हणमंत कदम, भानुदास सस्ते, हिंदूराव चव्हाण, हणमंत गाढवे, आजी- माजी पदाधिकारी आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |