04:49pm | May 21, 2022 |
सातारा : जगाच्या पाठीवर दोनशेहून अधिक देश आहेत. यातील अनेक देशांना स्वातंत्र्य मिळाले. कोणते देश या संपूर्ण विषयावर राज्य करतील हा विचार केला असता भारत देश संपूर्ण जगाचा विश्वगुरू होईल, असे उद्गार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी काढले.
सातारा येथील शाहू कलामंदिरात प्राचार्य रमणलाल शहा यांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरी -अमृत संजीवनी या ग्रंथाच्या लोकार्पण सोहळ्यात डॉ. विजय भटकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमात न्यायमूर्ती डॉ. मदन महाराज गोसावी, ज्येष्ठ शास्त्रज्ञ व नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू विजय भटकर, भारती विद्यापीठ (अभिमत विश्वविद्यालय) पुणेचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, डॉ. राजेंद्र शेजवळ, प्राचार्य, लालबहादूर शास्त्री महाविद्यालय,म.सा.प.चे शिरीष चिटणीस यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचा शुभारंभ श्री संत ज्ञानेश्वरांच्या मूर्तीचे तसेच ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या पूजनाने आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाल्यावर प्रास्ताविक भाषणात शिरीष चिटणीस यांनी प्राचार्य रमणलाल शहा हे ज्येष्ठ ज्योतिष विशारद म्हणून संपूर्ण देशात लोकप्रिय आहेत. आज ते साताराचे भूषण आहेत. लोकांना आधार देण्याचे कार्य ते अनेक वर्षे करत आहेत. ज्योतिषाच्या माध्यमातून चांगले ते सांगणे आणि प्रत्येक मनुष्याला आनंदी करण्याचा वसा सरांनी घेतला आहे. असे हे व्यक्तिमत्त्व खटाव तालुक्यात शिक्षणाची गंगा पसरवत होते. त्यांनी चार ते पाच पिढ्या घडवल्या आणि घरोघरी शिक्षणाची गंगोत्री पोहोचविली. आज 88 व्या वर्षी ही या पुस्तकाची निर्मिती त्यांनी सहज सोप्या भाषेत करुन ज्ञानेश्वरीचे संपूर्ण रसग्रहण केले याचे कौतुक वाटते असे सांगितले.
व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा सत्कार नितीन शहा व रोहित शहा यांनी कंदी पेढे, शाल, अमृत संजीवनी पुस्तक भेट देऊन केला.
याच कार्यक्रमात शहा कुटुंबियांच्या वतीने प्राचार्य रमणलाल शहा यांची नात व सौ. नेहा शहा- दावडा हिने सरांबद्दल चार शब्द मांडताना आमच्या कुटुंबाच्या सर्वांच्या जडणघडणीत सर्वांच्या अस्तित्व हे अनमोल आहे. ज्ञान व अनुभवाचे, कुबेराचे भांडार असणारे सर आणि त्यांच्या संपर्कात आलेला प्रत्येक माणूस हा त्यांच्या कडून प्रेमच मिळवतो. कर्मयोगी आजोबा निरपेक्षपणे प्रेम करत राहतात हे त्यांच्याकडून आम्ही शिकले. आज या ग्रंथाचे लोकार्पण हा खरोखरच सोनियाचा दिवस आहे असे आपल्या भाषणात सांगितले.
याप्रसंगी डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते प्राचार्य रमणलाल शहा यांचा शाल व पुणेरी पगडी देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर अमृत संजीवनी या ज्ञानेश्वरी वरील ग्रंथाचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
प्राचार्य रमणलाल शहा यांच्या दिवंगत पत्नी विजया शहा यांचे स्मरणार्थ सातारा येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालयास पन्नास हजार रुपयाचा धनादेश नगर वाचनालयाच्या संचालकांकडे सुपूर्त करण्यात आला.
याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना प्राचार्य रमणलाल शहा म्हणाले, मनाला समाधान व प्रसन्नता देणारे हे ज्ञानेश्वरी वांग्मय आहे. मागील दोन वर्षात 25 हून अधिक पुस्तकांचा अभ्यास करून हे लेखन पूर्ण केले. आपले मन भिरभिरते, भरकटते, नाउमेद होते, उदास होते अनेक वेळा घोटाळते,अस्वस्थ होते. या मनाला प्रेरणा देण्याचे काम संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्या ज्ञानेश्वरी व गाथेतून आपल्याला मिळते. श्रीकृष्णाने सर्वांना सांगितले आहे की मन हे प्रसन्न करा आणि भक्ती तद्रूप तन्मयतेने व तल्लीन नेते करा मी योग यांमध्ये किंवा वैकुंठात सापडणार नाही तर मी तल्लीन भक्ती मध्येच सापडेल आजच्या पिढीला मार्गदर्शन करताना सरकारने शैक्षणिक धोरणांमध्ये ज्ञानेश्वरी व गाथेचे योगदान घेतले पाहिजे आज जगामध्ये ख्रिश्चन लोक भगवद्गीतेला डोक्यावर घेऊन नाचत आहेत त्याच्या लाखो प्रती छापत आहेत वितरित करीत आहेत आणि आज तुम्हाला जर ही गीता आणि ज्ञानेश्वरी शिकवली नाही तर ती पुढील पिढीला कोण शिकवणार संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर हे जगातले चमत्कार मानावे लागतील त्यांच्यासारखे आजवर कोणालाही लिहिता आले नाही पद पैसा श्रीमंती मोठेपणा यातून मोकळे व्हा सुसंस्कृतपणे वाघा प्रामाणिक रहा मनाला निर्मळ गंगे सारखे वाहू द्या सुख-दुःखाचे चक्र हे सुरूच राहणार. आपल्या संतांनी सर्व जग हे संपन्न व सुखी व्हावे अशी देवाकडे प्रार्थना केली तसेच हे जग परिपूर्ण व्हावे असे त्यांना वाटत होते आता सध्या सर्व सोडून तुकोबा ज्ञानोबा हेच माझे सोबती आहेत व त्यांच्यामुळेच मनातला अंधकार दूर होईल हे सर्वांनी लक्षात घ्यावे.
भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम यांनी शहा सरांशी आपल्या कुटुंब यांचा तीस वर्षे ऋणानुबंध असल्याचे अभिमानाने सांगितले आणि अशा सरांशी आपले जवळचे नाते असल्यामुळे अध्यात्मात अले शिरोमणी असणार्या संत ज्ञानेश्वरांच्या साडेनऊ हजार ओव्यातून झालेल्या ज्ञानेश्वरी निर्मितीला शहा सरांनी आपल्या सहज सोप्या भाषेत आपणा सर्वांना दिलेल्या हा अनमोल ग्रंथाचा ठेवा खरोखरच आनंदाचा ठरणारा आहे या ग्रंथाची निर्मिती प्रचंड अभ्यासातून शहा सरांनी करताना अक्षरशा सूर्याला गवसणी घालण्याचे कार्य केले असून ते त्यांना शक्य आहे त्यांची धडपड उत्साह आणि प्रेम हे खरोखरच वाखाणण्यासारखे आहे असे सांगितले.
या सगळ्या प्रसंगी ज्येष्ठ विचारवंत व लेखक डॉ. सदानंद मोरे यांनी आपल्या भाषणामध्ये शहा सरांनी आधी तुकारामांवर लेखन केले, व आता संत ज्ञानेश्वरयांचेवर केलेले लेखन हे आधी कळस मग पाया असे झाल्यासारखे वाटते, असे सांगत गेली दोन वर्षे सरांनी या लेखनात प्रचंड बुडून जाऊन अभ्यास करत आपणापुढे आणले आहे. भाषेचे स्वरूप बदलते असते आणि ही काळाची गरज आहे. कारण साडेतीनशे तसेच साडेसातशे वर्षांपूर्वी झालेले हे लिखाण सध्याच्या पिढीला समजण्यासाठी आजच्या भाषेत येणे जरुरीचे आहे. अशा चांगल्या ग्रंथांना बाजूला न ठेवता आपल्या संस्कृतीसाठी आदर्श विचार पुन्हा पुन्हा मांडण्याची गरज आहे. आम्ही मूळ लेखनाला डावलत नाही, मात्र तरुण पिढीला समजेल अशा भाषेत ते समजावून सांगणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. सरांनी ही ज्ञानेश्वरी आजच्या पिढीतल्या लोकांना कळेल अशी मांडली आहे. संताना तुमच्या जीवनात जे प्रश्न सोडवायचे होते त्यासाठी ते लिहिते झाले. आजच्या काळातल्या प्रश्नांची उत्तरे दाखवून देण्यासाठी हे लेखन महत्त्वाचे काम करेल. आणि आपल्या सर्वांना आधार हा तुकारामांच्या गाथा आणि संत ज्ञानेश्वरीचा आहे असे आवर्जून सांगितले.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलताना डॉ. विजय भटकर म्हणाले की भारताची वाटचाल ही विश्वगुरू होण्यासारखी चा आहे आज देशात 1000 विद्यापीठे आणि चाळीस हजारहून महाविद्यालय आहेत. शंभर वर्षांपूर्वी स्वामी विवेकानंदांनी जो विचार मांडला, त्यामध्ये जर शाळेपर्यंत मुले जाऊ शकली नाहीतर शाळा घरापर्यंत येऊ द्या आणि हेच मागील दोन वर्षात घडले आहे या काळात शहा सरांनी अभ्यास करून नवीन विचार पुढे आणला शिक्षण कोणत्या माध्यमातून द्यायला हवी यामध्ये शालेय स्तरावर महाविद्यालयीन स्तरावर तसेच प्रोफेशन साठी सुद्धा गरजेचे आहे आपले जग बहुभाषिक झाले आहे सर्वत्र इंग्रजी असताना नवीन शिक्षण नीती मध्ये मातृभाषेत तसेच राष्ट्रभाषा हिंदीतही आपल्याला विज्ञान मेडिकल आणि रिसर्च आदीं बाबत शिक्षण घेता येणे शक्य आहे. आपल्या भारतीय भाषांचा अभ्यास हा झालाच पाहिजे तत्कालीन तक्षशिला, नालंदा विद्यापीठात भिकू लोक जाऊन शिकत होते ते जसे शिक्षण घेत होते तेच शिक्षण आपण आता घेणे गरजेचे आहे आणि मला आत्मविश्वास आहे की ते आपण तसे देऊ शकू. वेद, वेदांग आणि दर्शन भारतीय ज्ञान प्रणाली आहे त्याचे पुनरुत्थान झालेच पाहिजे ते सोपे होण्यासाठी आणि घरोघरी पोहोचणसाठी गाथा ज्ञानेश्वरी आत्मसात करावी
ज्योतिषशास्त्र ही महत्त्वाचे आहे विज्ञान म्हणजे भविष्याचा वेध सुपर र्कॉम्प्युटर बनवताना आम्हाला गरज होती ती पाऊस कधी येणार याचा शोध घेण्याची अत्यंत जटिल गणिते, ज्योतिष पाहते आणि विज्ञानाला धरूनच आजचे पंचांग ही आपण पाहतो हा समन्वय लक्षात घेऊन नवीन शिक्षण पद्धती अंगीकारावी लागेल आज विविध भाषेत ज्ञानेश्वरी आहे आणि बहुभाषिक ज्ञानेश्वरी तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे ज्ञान विज्ञान आणि अध्यात्म समजण्यासाठी शिक्षण उपलब्ध झालेच पाहिजे तर जगातले बहुसंख्य विद्यार्थी आपल्या देशात शिक्षण घेण्यासाठी येऊन गाथा ज्ञानेश्वरी अनुभव येतील अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालूनच देश विश्वगुरू आपण बनवूया.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.मदन महाराज गोसावी यांनी प्राचार्य रमणलाल शहा सरचे विशेष अभिनंदन करून मी सरांचा विद्यार्थी असून मला घडवण्यात सरांचे मोठे योगदान आहे. मनाच्या साक्षीभावाने वैयक्तिक संपन्नता मिळवण्यासाठी सरांच्या वतीने झालेले एक ग्रंथाचे लेखन महत्त्वाचे आहे ज्ञानेश्वर माऊलींनी भौतिक पातळीवर वरून कर्मयोग हा भक्तिमार्गातून ज्ञानयोगी केला आणि ज्ञानेश्वरीत मूलगामी तत्त्वज्ञान सहजपणे तत्कालीन समाजाला सांगितले माणसातली ईश्वर माऊलींनी सातशे वर्षांपूर्वी सांगितले मागील दोन वर्षात करोना काळात लोक सेवेला धावले माणूस जरी भजनी शिवा असला तरी संतांचे संस्कार हे आपल्याला या कृ त्यातून पाहायला मिळाले संत साहित्य हे अभ्यासातून पुढील पिढीला दिले नाही तर ही पिढी आपल्याला माफ करणार नाही असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य राजेंद्र शेजवळ यांनी समाजाला ज्याची गरज आहे ते लेखन या वयातही शहा सरांनी करून देत हीच उमेद आपणा सर्वांना दिली आहे अशा या अतिशय प्रेरणादायी ग्रंथातून सरांची ऊर्जा की आपणा सर्वांना मिळो व सरांची याही वयात असलेली ज्ञानलालसा अशीच वृद्धिंगत होतो अशा शब्दात शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. महेश गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन महेश कुलकर्णी. यांनी केले सौ. वैदेही कुलकर्णी यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी प्राचार्य पुरुषोत्तम सेठ ठाकूर भाई शहा रमणभाई शहा गौतम भोसले वारकरी महामंडळाचे जिल्हा अध्यक्ष बबनराव सापते, अतुल दोशी, चंद्रकांत शहा, ज्योतिष मंडळाचे सदस्य, वि.ना. लांडगे, विवेक मेहता, सौ.शहा, मनोज मेहता, श्रीकांत शहा,डॉ.श्याम बडवे, अनंत जोशी यांचेसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सांगते नंतर सर्व उपस्थित सातारकरांना ज्ञानेश्वरी-अमृत संजीवनी हा ग्रंथ मोफत वितरीत करण्यात आला.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |