11:34am | Jan 21, 2021 |
आमचं सरकार स्थापन होऊन एक वर्षे पूर्ण झाले. सरकार स्थापनेनंतर दोन तीन महिन्यातच कोरोना सारख्या जागतिक महामारीचा सामना या सरकारला करावा लागला. अजूनही कोरोना संसर्ग संपलेला नाही पण त्याचा वेग आटोक्यात आला आहे. " माझं कुटुंबं माझी जबाबदारी " या मिशन मोड वरील कामामुळे लोकांमध्ये मोठी जाणीव जागृती झाली. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रसार रोखायला मोठी मदत झाली... कोरोना असतानाही या शासनाने अनेक महत्वाकांक्षी निर्णय केले. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती असेल, अतिवृष्टीची मदत असेल.. हे सगळे करून विकास रथ सुरु ठेवण्यासाठी टप्या टप्याने लॉकडाऊन उठवलं.. जिल्हा म्हणून कोणकोणत्या गोष्टी करता आल्या त्याचा आढावा घेतला तर आपल्याला हे सरकार शेतकरी आणि सर्वसामान्यांचं आहे हे कळेल...!!
महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना :-
मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मा. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, यांच्या नेतृत्वाखाली महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 ही योजना 27 डिसेंबर, 2019 रोजी जाहीर करण्यात आली. या योजनंतर्गत दि. 1 एप्रिल, 2015 ते 31 मार्च, 2019 रोजी पर्यंत ज्या शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. ही योजना पूर्णत: संगणकीय प्रणालीद्वारे राबविण्यात येत आहेत. ही कर्जमुक्ती योजना शेतकऱ्यांसाठी नव्याने आणि जोमाने शेती करण्यासाठी नवा आशेचा किरण घेऊन आला आहे.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडील 42 हजार 175 व अन्य बँकांकडील 22 हजार 895 खातेदार अपलोड करण्यात आले होते. जिल्हा मध्यवर्ती बँकेकडील 39 हजार 204 व अन्य बँकांकडील 19 हजार 885 असे एकूण 59 हजार 89 खातेदारांची नावे प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत. तर 39 हजार 40 मध्यवर्ती बँकेडील व 19 हजार 436 अन्य बँकांकडील खातेदारांचे प्रमाणीकरण झालेले आहे. या प्रमाणीकरणानुसार 58 हजार 107 शेतकऱ्यांच्या खात्यावर रु. 364.13 कोटी लाख रुपये महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत रक्कम जमा झालेली आहे.
पिक कर्ज योजना :-
सन 2020-21 यावर्षातील खरीप हंगामासाठी राज्याचा रु. 45,785 कोटी रुपये एवढा लक्षांक निश्चित करण्यात आला आहे. त्यापैकी 01/04/2020 ते 31/07/2020 या कालावधीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व व्यापारी बँकांनी सुमारे 30.22 लाख शेतक-यांना रु. 22,762 कोटी एवढा पीक कर्जपुरवठा केलाआहे. विशेषत: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी त्यापैकी 21.35 लाख शेतक-यांना सुमारे रु. 11,574 कोटी एवढा पीक कर्ज पुरवठा केला आहे. कर्ज वाटपाचे हे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत 38%टक्के जास्त आहे.
सातारा जिल्ह्याचा विचार केला असता खरीप हंगामासाठी 1600 कोटीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या उद्दिष्टानुसार 2 लाख 48 हजार 328 शेतकऱ्यांना एकूण 1570 कोटी 50 लाख रुपये कर्ज वाटप करण्यात आले असून त्याची टक्केवारी 98 इतकी आहे.
बांधावर खत व बियाणे वाटप :-
कारोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कालावधीत शेतकऱ्यांना खते, बियाणे उपलब्धता सुरळीत होण्याच्या दृष्टीने कृषी विभागामार्फत बांधावर खत व बियाणे वाटप मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यात 21 हजार 181 शेतकऱ्यांना 1 हजार 38 शेतकरी गटांमार्फत 6018.62 मे. टन खते व 3178.83 क्विंटल बियाणे वाटप करण्यात आले.
कोरोना संसर्ग कालावधीत फळे व भाजीपाला पुरवठा :-
शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविणे, शहरांमधील सोसायट्यांमध्ये पोहचविणे यामध्ये येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी कृषी विभागामार्फत समन्वय करण्यात आला. सातारा जिल्ह्यात 1 हजार 366 गटांच्या माध्यमातून 45 हजार 436 क्विंटल भाजीपाला व 25 हजार 917 क्विंटल फळे थेट ग्राहकांना विक्री करण्यात आली.
कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या क्षेत्रीय भेटी :-
जागतिक पर्यावरण बदलामुळे निसर्गचक्र, त्यातून अवेळी पाऊस, अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांचे घटलेले उत्पादन, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे होणारे नुकसान, उत्पादित मालाला योग्य बाजारभाव न मिळणे यामुळे शेतऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी, यातून निर्माण झालेली चिंता याबाबींचा विचार करताना शेतकऱ्यांशी परिणामकारक संवाद साधणे गरजेचे आहे. कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रक्षेत्रास भेट देणे, प्रभावी संवाद साधणे व योजनेच्या अंमलबजावणीसाठी कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांशी संवाद साधून कृषी विभाग जिल्हास्तर ते ग्रामस्तरापर्यंत कामकाज प्रभावीपणे करत आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजना :-
खरीप हंगाम सन 2019 मध्ये 74 हजार 140 शेतकऱ्यांनी योजनेमध्ये 48 हजार 654 हेक्टर क्षेत्रावर सहभाग घेतलेला होता. खरीप हंगाम सन 2019 मध्ये 31 हजार 557 इतक्या शेतकऱ्यांना रु. 7 कोटी 61 लाख 63 हजार 732 इतकी नुकसान भरपाई मिळालेली आहे. रब्बी हंगाम सन 2019-20 मध्ये 880 शेतकऱ्यांनी 313 हेक्टर क्षेत्रावर सहभाग घेतलेला आहे. खरीप हंगाम सन 2020 मध्ये 38 हजार 651 शेतकऱ्यांनी योजनेमध्ये 8 हजार 166 हेक्टर क्षेत्रावर सहभाग घेतला आहे.
लॉकडाऊनच्या काळात परप्रांतीयाना सोडले घरी :-
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, सातारा विभागामार्फत 7 मे रोजी सातारा ते पॉडेचरी 23 प्रवाशी, सातारा ते राजस्थान येथील राणिवाडा 23 प्रवाशी, वडूज राणिवाडा 22 प्रवाशी असे एकूण 68 प्रवाशी एसटीमहामंडळाच्या बसेसने सोडण्यात आले.
दि. 9 मे रोजी सातारा-वडूज ते भंडारा 22, दि. 10 मे रोजी मेढा ते उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे 23 असे एकूण 45 प्रवाशी सोडण्यात आले.
दि. 11 मे रोजी वडूज ते कर्नाटक राज्यातील हल्ल्याळ येथे 22, कराड ते तामिळनाडू येथील शेलम 9 एसटी बसेस सोडण्यात आल्या, यातून 201 प्रवाशी सोडण्यात आले. सातारा ते मध्य प्रदेश येथील सुलतानपूर येथे 23 प्रवाशी सोडण्यात आले. तसेच महामंडळाच्या सातारा विभागामार्फत हैद्राबाद व गुलबर्गा येथे लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मजुरांना सोडण्यात आले.
वैद्यकीय महाविद्यालय :-
सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला सन 2021- 22 या वर्षा पासून एमबीबीएस 100 जागांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने संलग्नतेसाठी मान्यता दिली आहे. शासनाने आवश्यकता प्रमाणपत्रही दिले आहे. दि. 2 डिसेंबर, 2020 रोजी नॅशनल मेडिकल आयोगा ( NMC ) कडे मान्यतेसाठीचा प्रस्ताव पाठविला आहे.
सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जानेवारी 2021 पासूनच पूर्व तयारी सुरु करण्यात येणार असून सातारा येथील स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरण करण्यात आले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदी डॉ. संजय गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ गायकवाड हे पुणे येथील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातील श्वसन रोग विभाग प्रमुख म्हणून सध्या कार्यरत आहेत.
सातारा येथे नव्याने होणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी अपेक्षित असलेली जलसंपदा विभागाची कृष्णानगर येथील 61 एकर 20 गुंठे जागा सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालयासाठी हस्तांतरित करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या दि. 15 जानेवारी, 2021 च्या शासन निर्णयानुसार सातारा येथील 100 विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि 500 खाटांचे रुग्णालय इमारत व अनुषंगिक बांधकाम करणे यासाठी रु. 495 कोटी 46लाख इतक्या रकमेची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे...
जिल्हा कोविड हॉस्पीटल :-
राज्यात काही महिन्यांपासून कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्य शासनाने जिल्हास्तरावर, तालुकास्तरावर आरोग्य सुविधा देण्यावर भर दिला आहे. काही सामाजिक संस्था, स्वयंसेवकांनीही पुढाकार घेतला आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी एक कोरोना हॉस्पीटल असावे सगळ्यांची इच्छा होती. त्यानुसार राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज संग्रालयात कोविड हॉस्पीटल उभारण्यासाठी मान्यता देवून सर्व ते सहकार्य केले. या हॉस्पीटलमध्ये 234 ऑक्सीजन बेड व 52 आयसीयु बेड आहेत. डायलिसीस असणाऱ्या रुग्णांना रुग्णालये घेत नाहीत अशा रुग्णांसाठीही 4 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. बांधकाम व विद्युत सुविधेसाठी रु. 5 कोटी 92 लाख 70 हजार, वैद्यकीय उपकरणांसाठी रु. 6 कोटी 84 लाख 97 हजार 2061 रुपये तर मनुष्यबळ व इतर गोष्टींसाठी 6 महिन्यांसाठी रु. 13 कोटी 99 लाख 32 हजार इतका खर्च करण्यात आला आहे. रुग्णांची तपासणी करुन या रुग्णालयात रुग्णांवर उपचार केले जात आहेत . कोविड हॉस्पीटल उभारणीसाठी राज्य शासनाबरोबर स्वयंसेवक, उद्योगांनी मदत केली आहे.
कोविड प्रतिबंधक लस :-
कोरोना संसर्गामुळे देशाबरोबर राज्याचे अर्थ चक्र थांबले. अनेकांचे प्राण गेले त्याचबरोबर सर्वांनाचा याचा त्रास झाला. देशासह राज्यात कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा कार्यक्रमाचा शुभारंभ दि. 16 जानेवारी 2021 रोजी झाला. पहिल्या टप्प्यात शासकीय व खासगी आरोग्य संस्था अंतर्गत कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात पोलीस विभाग, सैन्य दल, हवाई दल व तिसऱ्या टप्प्यात सर्व सामान्य नागरिकांना लस देण्यात येणार आहे. लस ही स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, कराड, उपजिल्हा रुग्णालय, फलटण, ग्रामीण रुग्णालय, पाटण, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव, ग्रामीण रुग्णालय, माण, ग्रामीण रुग्णालय, खंडाळा, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड, मिशन हॉस्पीटल वाई या 9 ठिकाणी लस देण्यास व्यवस्था करण्यात आली आहे. लस देण्यासाठी सुसज्ज अशी यंत्रणा आरोग्य विभागामार्फत उभी करण्यात आली आहे.
मागच्या एक वर्षाच्या कालावधीत ही काही ठळक कामांना गती देण्यात आली आहे. यापुढे यापेक्षा अधिक वेगाने या जिल्ह्याचा विकास करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने सातारा जिल्ह्यातील अपूर्ण राहिलेले प्रकल्प पूर्ण करणे, नवे प्रकल्प आणून रोजगार निर्माण करण्यावर भर देण्याचं काम पुढील काळात करायचं आहे.
- ना. बाळासाहेब पाटील सहकार, पणन तथा पालकमंत्री, सातारा.
शब्दांकन :- युवराज पाटील, जिल्हा माहिती अधिकारी
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |
अजित वाकनीस यांचे निधन |