05:40pm | Apr 04, 2022 |
वाई : किसन वीर साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील आणि त्यांचे बंधु जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन पाटील यांचे अर्ज बाद झाल्याने एकाच गोंधळ उडाला आहे. तसेच कोरेगाव, सातारा, वाई, बावधन, जावळी, गटात अनेक दिग्गजांचे उमेदवारी अर्ज बाद केल्याने उमेदवांरानी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना धारेवर धरले असून चुकीच्या पद्धतीने अर्ज बाद केल्याचा त्यांच्या आरोप करण्यात आला आहे.
किसन वीर साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील व सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्याची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे मागणी विरोधकांनी केली आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर झालेल्या सुनावणीत आमदारांच्या बाजूने युक्तिवाद करताना वकील म्हणाले, ऊस नोंदविला असताना कारखान्याने उसाची तोड केली नाही, त्यावर्षी 12 लाख टन उसाची नोंद असताना कारखान्यांने चार लाख टनाचे गाळप केले. कारखाना उशिरा सुरु करुन लवकर बंद केला. कारखाना पूर्ण क्षमतेने चालविला नाही. अनेक शेतकऱ्यांचा ऊस न नेता त्यांचे नुकसान केले. यामुळे उमेदवार अर्जावर चुकीच्या पद्धतीने नोंद घेवून अर्ज बाद करण्यात आला आहे.
नितीन पाटलांनी कारखान्याला ऊसच घातला नाही
दरम्यान, या निवडणुकीत उतरुन कारखाना ताब्यात घेण्याची स्पप्ने पाहणाऱ्या पाटील बंधुंचे अर्ज बाद झाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये गोंधळ उडाला आहे. मात्र, याबाबत विरोधकांनी आपली बाजू मांडताना सांगितले की, कारखान्याची निवडणूक लढविण्यासाठी पाच वर्षांमध्ये तीन वर्षे ऊस हा कारखान्याला घालणे आवश्यक आहे, या नियमावर नितीन पाटील यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला आहे, तसेच मोठ्या प्रमाणात सोसायटीनी आमदारांच्या विरोधात हरकत नोंदविली आहे. दोघांचेही अर्ज बाद झाल्याने आज अर्ज छाननी होण्याच्या दिवशी प्रशासकीय कार्यालयात एकच गोंधळ उडाला आहे.
आ. मकरंद आबांनी सोसायटी गटातून, नितीनकाकांनी कवठे गटातून तर मदनदादा भोसले यांनी भुईंज गटातून अर्ज दाखल केले आहेत. यानिमित्त दोन वर्षानंतर पुन्हा एकदा भोसले विरूध्द पाटील असा संघर्ष पहायला मिळणार होता. मात्र, आता लढाईच्या मैदानात सेनापतीच नसल्याने निवडणुकीत काय होणार याची चर्चा आता सुरु झाली आहे. वास्तविक पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या किसनवीर कारखान्याचीची सत्ता मिळवण्यासाठी भोसले विरुद्ध पाटील यांच्यातील राजकीय वैर अनेक दशकांपासून सुरु आहे. निवडणूक कोणतीही असो यांच्यातील संघर्ष शिगेला पोहचतो. 10 वर्षानंतर पुन्हा एकदा कृष्णाकाठी सत्तासंघर्ष पहायला मिळणार आहे. मात्र, आमदार मकरंद पाटील व नितीन पाटील यांचे अर्ज बाद झाल्याने त्यांच्या समर्थकांचे सेनापतीच लढाईत नसणार आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |