07:12pm | Jan 22, 2021 |
सातारा : वीज बिल वसुलीसाठी वीज कनेक्शन तोडण्याचा इशारा महावितरणने दिल्यानंतर सर्वच विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उडवली आहे. आर्थिक संकटाचा सामना करणार्या वीज ग्राहकांकडून अशी वसूली करण्याचा निर्णय घेणे म्हणजे खासगी सावकारीचा प्रकार असून मुख्यमंत्र्यांनी खासगी सावकाराच्या भूमिकेतून बाहेर पडावे, अशी टिका आपचे सरदार सागर भोगावकर यांनी केली आहे. तसेच राज्य शासनाने वीज बिल प्रश्न दिलासा न दिल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला आहे.
याबाबत देण्यात आलेल्या प्रसिध्दपत्रकात म्हटले आहे की, कोरोना संकटकाळाने जवळपास वर्षभर सर्वसामान्यांचा रोजगार हिरावला गेला आहे. घरगुती आणि लघु उद्योजक ग्राहकांना या लॉकडाउन चा फटका बसला असल्याने त्यांची वीज बिल थकबाकी आहे. त्यांच्या खिशात पैसे नसताना त्याची वीज कापणे म्हणजे सावकारीच आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभ्यास करूनच 30 टक्के वीज सवलतीचे आश्वासन वचननाम्या द्वारे राज्यातील जनतेला दिले होते. मग आता शब्द न पाळता कनेक्शन कट करण्याची धमकी, यामागे कुणाचा दबाव आहे हे त्यांनी जनतेस सांगावे. चुकीच्या पध्दतीने वीजबिले पाठवून जनतेची लूट करण्याचा हा प्रकार संतापजनक आहे. उर्जामंत्री यांनी तर याबाबत आत्तापर्यंत तीन वेळा वेगवेगळी विधाने केली आहेत.
दिल्लीत आप सरकार गेले काही वर्षे 200 युनिट वीज मोफत देते आहे. महाराष्ट्रात सरकारची भूमिका अडेलपणाची आहे. खरेतर सार्वजनिक दिवाबत्ती-पाणीपुरवठा व इतर शासकीय सेवांची वीजबिल थकबाकी मोठी आहे. तसेच उच्चदाब व बेकायदेशीर वीज वापराचा/ गळतीचा बोजा पण मोठा आहे. ती रक्कम वसूल न करता सामान्य ग्राहकांच्या अंगावर तो बोजा टाकणे अयोग्य आहे.
वीज बिल प्रश्न दिलासा देण्यासाठी राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याचा दावा करणार्या महाराष्ट्र सरकारने मद्यविक्री परवाना शुल्कात 360 कोटींची सवलत दिली आहे, एकूणच राज्य सरकारच्या या कारभाराला कंटाळूनच ग्रामपंचायत निवडणूकीत महाविकास आघाडीला झटका दिला आहे. परंतू आपल्या सोयीनुसार त्याचा अर्थ लावत आपल्यालाच जनतेने बहुमत दिल्याचे सांगत आहेत. ग्रामपंचायत निवडणूकांत जनादेश मिळाला नाही म्हणून राज्य सरकारने सक्तीची विजबिल वसुली मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला असल्याचा आरोपही त्यांनी या प्रसिध्दीपत्रकाद्वारे केला आहे.
सरकारने वीजबिल वसुली प्रकरणी अवलंबलेले चुकीचे धोरण बदलले नाही तर जनतेच्या प्रक्षोभाला सामोरे जावे लागेल. आपतर्फे या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |