05:56pm | May 27, 2020 |
मुंबई: राज्यातील शाळा जूनपासून सुरू करण्याची तयारी शिक्षण विभाग करत आहे. मात्र, सध्या उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांमध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षित ठेवण्याचे, निकष पाळण्याचे आव्हान शाळांना पेलावे लागणार आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्थांना विद्यार्थी सुरक्षेचे शिवधनुष्य पेलणार का? हा प्रश्न पालकवर्गातून उपस्थित केला जात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा दोन महिन्यांपासून बंद आहेत. या काळात विद्यार्थींना पोषण आहाराचा तांदुळ घरी देण्यात आला. सध्या शाळेतील शिक्षक व्हॉटस् अॅपच्या माध्यमातून मुलांना घरी अभ्यास देत आहेत. कोरोनाच्या संकटकाळात शक्य त्या मार्गाने विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास मदत केली जात आहे. परंतु आता शाळा केव्हा सुरू होणार? याबाबत पालकवर्गात चिंतेचे वातावरण आहे. जरी शाळा सुरू झाल्या तरी पालकवर्ग मुलांना शैक्षणिक संस्थांच्या विश्वासावर शाळेत लगेच पाठवतील का? असाही प्रश्न आहे.
राज्यातील शाळा सुरू करताना दोन विद्यार्थ्यांमध्ये दीड मीटरचे अंतर राखणे, दर दोन तासांनी विद्यार्थी हाताळत असलेल्या वस्तू निर्जंतुक करणे असे निकष पाळण्याचे आव्हान राज्यातील शाळांपुढे राहणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेच्या बसऐवजी पालकांनीच शाळेत सोडावे. प्रत्येक शाळेने प्रवेशदारावर विद्यार्थ्यांचे तापमान तपासण्याची सुविधा उपलब्ध करावी. एकाच प्रवेशदारावर गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. बाहेरच्या कुणालाही शाळेत प्रवेश देण्यात येऊ नये. तापमान अधिक असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात यावे. विद्यार्थी शाळेच्या वेळेत आजारी पडल्यास त्यांच्यासाठी शाळेतच स्वतंत्र खोली असावी. त्याचप्रमाणे संगणक, बटणे, जिन्याचे कठडे, इतर साहित्य अशा मोठ्या प्रमाणात हाताळल्या जाणा-या गोष्टी दर दोन तासांनी निर्जंतुक करण्यात याव्यात. रोज वगार्ची सुरुवात स्वच्छतेच्या सवयी, काळजी कशी घ्यावी अशी माहिती विद्यार्थ्यांना देण्यापासून व्हावी. प्रयोगशाळा, ग्रंथालये येथील वावरावर निर्बंध आणावेत.
वर्ग सोडून अन्यत्र कोणत्याही ठिकाणी काही उपक्रम घ्यायचा असल्यास तो परिसर उपक्रम घेण्याआधी आणि नंतर निर्जंतुक करण्यात यावा, अशा सूचना भारतीय गुणवत्ता परिषदेने दिल्या आहेत. विविध क्षेत्रातीलतज्ज्ञ, उद्योजक यांचा समावेश असलेली ही शासनाची स्वायत्त सल्लागार संस्था आहे. यापुढील काळात ऑनलाइन व डिजिटल शिक्षणाचे पर्यायसुद्धा मोठ्या प्रमाणावर परिणामकारकरीत्या उपयोगात आणावेत. त्याचप्रमाणे अभ्यासक्रम कमी करणे, विद्यार्थ्यांना टॅब आणि स्टोरेज कार्ड देण्यात यावे, ऑनलाइन शिक्षणाचे पर्याय सक्षम करण्यात यावेत, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षण विभागाला दिल्या आहेत. विभागातील अधिकार्यांबरोबर ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक घेतली.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |