04:50pm | May 27, 2020 |
अहमदनगर: एकीकडे सत्तेत राहायचे, सत्तेचा मलीदा चाखायचा आणि दुसरीकडे निर्णयाचे आधिकार नाहीत म्हणून जबाबदारी झटकायची असे दोन्ही बाजूने बोलायचे असे कसे चालेल?, असा सवाल करत विखेंनी काँग्रेसवर टीका केला.
काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या विधानावर विखे पाटील यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. निर्णयाचे आधिकार नसतील तर सत्तेत राहाता कशाला? सत्तेतून बाहेर पडण्याची हिम्मत दाखवा, असे आव्हान देताना राज्यात निर्माण झालेल्याा अवस्थेला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरच राज्यातील काँग्रेस नेतेही तेवढेच जबाबदार आहेत, असा आरोप विखे पाटील यांनी केला आहे.
राहुल गांधी यांच्या विधानावर विखे म्हणाले, ‘राहुल गांधींचे विधान दुटप्पी आहे. सरकारमध्ये राहायचे आणि आम्हाला निर्णयाचे आधिकार नाहीत, असे जाहीरपणे सांगायचे हे अनाकलनीय आहे. असंच आहे तर मग तुम्ही सरकारमध्ये थांबलात कशाला, तात्काळ सरकारमधून बाहेर पडण्याची हिम्मत दाखवा.
राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेसला जबाबदारीही नको आहे आणि सत्तेतून बाहेरही पडायचे नाही. याला ‘डबल ढोलकी’पणा म्हणतात. काँग्रेस पक्षाची अवस्था सध्या ढोलकीसारखी झाली आहे’, अशी टीका काँग्रेसला काही महिन्यांपूर्वीच रामराम ठोकून भाजपमध्ये गेलेले माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
राज्यातील प्रत्येक घटक करोनाच्या संकटामुळे अडचणीत आला आहे. गांधी यावर कधी बोलले नाहीत. मुख्यामंत्र्यांच्या काही व्यक्तिगत अडचणी असतील, त्यामुळे ते ’मातोश्री’ निवासस्थानाबाहेर जावू शकत नाहीत. परंतु बाकीचे मंत्री मुंबईत का थांबले नाहीत? केंद्र सरकारने महाराष्ट्राला विविध माध्यमांतून 28 हजार कोटी रुपयांची मदत देवू केली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या या मदतीवर टीका करण्यापेक्षा राज्यातील जनतेला तुम्ही काय दिले, याची श्वेतपत्रिका काढा, अशी मागणी विखेंनी केली.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |